अज्ञातांकडून लावण्यात आली आग
प्रतिनिधी/ येळ्ळूर
राजहंसगड किल्ल्याच्या परिसरात वणव्यामुळे शेकडो एकर जमिनीतील गवत (करड) जळून खाक झाले. अज्ञातांनी लावलेल्या आगीमुळे शेतकऱयांचे मोठे नुकसान झाले असून जवळपास 500 एकरातील हजारो रुपयांचे गवत जळाले आहे.
शेतकरी उन्हाळय़ात आणि पावसाळय़ात जनावरांना चारा साठा करण्यासाठी राजहंसगडाच्या परिसरातील जमिनीतील गवत कापून ठेवतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये मजुरीमध्ये वाढ झाल्याने तसेच मजूर मिळत नसल्यामुळे हे काम लवकर होत नाही. बऱयाच वेळा मजूर नसल्यामुळे गवत कापण्यास उशीर होत असतो. अशा वेळेला अज्ञात व्यक्ती सिगारेट किंवा इतर वस्तू पेटविताना आग तशीच टाकतात. त्यामुळे ती आग पसरत जाऊन परिसरातील गवत जळून खाक होते. यावेळीही अशाच प्रकारे अज्ञातांनी टाकलेल्या आगीमुळे मोठे नुकसान झाले आहे.
गवताचा दर गगनाला भिडला आहे. गवत नसल्यामुळे अनेक शेतकऱयांवर जनावरे विकण्याची वेळ आली आहे. येळ्ळूर, सुळगे या परिसरातील शेतकरी या ठिकाणचे गवत कापून दरवषी साठा करत असतात. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये आगीत गवत जळून खाक होत आहे. पुन्हा यावषीही ही घटना घडल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.