रत्नागिरी जिल्हय़ात धुवाधार, गुहागर तालुक्यातील पडवेत नदी बुडून म्हशीचा मृत्यू, तीन जखमी
प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुंबईसह महाराष्ट्रात मान्सूनने चांगला जोर पकडला आहे. रविवारपासून सुरू असलेल्या पावसाने सोमवारी दुपारपर्यंत रत्नागिरी जिल्हय़ाला चांगलेच झोडपले. राजापुर तालुक्यात पुराच्या पाण्यात एक जण वाहून गेला आहे. तर गुहागर तालुक्यात चार म्हशी पुराच्या पायात वाहून गेल्या होत्या. एका म्हशीचा मृत्यू झाल्या तर 3 म्हशी जखमी झाल्या आहेत. जिह्यातील खेड तालुक्यातील जगबुडी, लांजातील काजळी, राजापुर तालुक्यातील कोदवली, संगमेश्वर तालुक्यातील शास्त्राr, सोनवी या नद्यानी इशारा पातळी ओलांडल्याची माहिती जिल्हा पूर नियंत्रणकक्ष रत्नागिरी यांनी सायंकाळी 6 वाजता दिली. ठिकठिकाणी नद्यालगतची शेती पाण्याखाली गेल्याचे चित्र होते.
रत्नागिरी तालुक्यालाही नदय़ा-नाले पुन्हा तुडूंब भरून वाहू लागले आहेत. शेतीची कामे दमदार पावसाविना खोळंबलेली होती. पण आता या पावसाच्या आगमनाने शेतकरी खुश झाला आहे. खोळंबलेल्या शेतीच्या लावण्यांची कामे भरभर आटण्याची शिवारात पुन्हा लगबग सुरू झालेली आहे.
राजापूर तालुक्यात सोमवारी अर्जुना व कोदवली नदीच्या पुराच्या पाण्याने शहराला वेढा दिला आहे. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जवाहर चौकातील टिळेकर फोटो स्टुडीओपर्यंत पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. शिवाजीपथ, बंदरधक्का, वरचीपेठ रस्ता, गुजराळी रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूकही बंद होती.
रविवारी सायंकाळी कोदवली नदीचे पाणी जवाहर चौकातील टपऱयांपर्यंत आले होते. रात्री पावसाचा जोर वाढल्याने पाण्यात वाढ होत मध्यरात्री पूराचे पाणी जवाहर चौकात आले. सोमवारी सकाळी पाण्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ापर्यंत मजल मारली. सायंकाळी पुराचे पाणी कुशे मेडीकल पर्यंत आले. त्यामुळे व्यापाऱयांसह नागरीकांची धावपळ उडाली.
शिवजीपथ, बंदरधक्का, चिंचबांध, वरचीपेठ, गुजराळी आदी भागातील रस्ते पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे. वरचीपेठ रस्त्यावर पूराचे पाणी आल्याने शिळ, दोनिवडे, गोठणे दोनिवडे मार्ग बंद झाला आहे. नदीकीनाऱयालतची भातशेतीही पाण्याखाली गेली आहे. कोदवली नदीचे पाणी जवाहर चौकात आल्याने एसटी फेऱया डेपोतूनच सोडण्यात आल्या. पुराच्या शक्यतेने नदीकिनाऱयालगतच्या व्यापाऱयांनी रात्रीच दुकानातील सामान सुरक्षित स्थळी हलवले. बाजारपेठेतील व्यापाऱयांनीही आपले सामान सुरक्षित स्थळी हलविल्याने कोणाचे नुकसान झाले नाही.
जवाहर चौक पाण्याखाली गेल्याने नगरपरिषदेची आपत्कालीन बोट तैनात ठेवण्यात आली होती. जवाहर चौकातून पलिकडे ये जा करण्यासाठी या बोटीचा वापर करण्यात आला. राजापूरात रविवारी सरासरी 153.50 तर आजपर्यंत एकूण 1234. 18 मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
राजापुरातील ग्रामीण भागातही पावसाचा जोर असून सुखनदीचे पाणी प्रिंदावण, बांदीवडे, तळेखाजन परिसरातील भातशेतीमध्ये शिरले आहे. राजापूर ओणी, पाचल मार्गावर सौंदळ येथे रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. तुळसवडे ते सोलीवडे दरम्यान रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने हा मार्गही बंद आहे. रायपाटण गांगणवाडी रस्त्यावर पाणी आल्याने पलीकडील गावांचा संपर्क तुटला. या परिसरातील शेतीही पाण्याखाली गेली आहे.
अर्जुनात एकजण वाहून केला
सोमवारी सकाळी 7.30 च्या दरम्यान अर्जुना नदीच्या पुरात एक 35 ते 40 वर्षींय प्रौढ वाह्नू गेल्याची माहिती तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिली आहे. कोंढेतडकडून राजापूर शहराकडे येणारा हा प्रौढ पुलावरून खाली उतरला. मात्र तेवढयात आलेल्या पाण्याचा लोंढय़ात तो वाहून गेला. एका महिलेने तो वाहून जाताना पाहिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. याबाबत पोलीस प्रशासनाकडून शोध सुरू आहे.
शीळ येथे घरावर झाड कोसळल्याने पती-पत्नी जखमी
राजापूर शहरानजीक शीळ येथील जयकुमार आणि विश्वास बिर्जे यांच्या घरावर आंब्याचे झाड कोसळल्याने पती-पत्नी जखमी झाले आहेत. रात्री 1 च्या सुमारास ही घटना घडली. झाड पडले त्या खोलीमध्ये विश्वास बिर्जे, त्यांची पत्नी आणि दोन मुले झोपली होती. सुदैवाने लहान मुलांना कोणतीही इजा झालेली नाही.
लांजा तालुक्यात सोमवारी मुसळधार पाऊस, नद्यांची पात्र दुथडी भरली
लांजा तालुक्यात गेले 15 दिवस दडी मारून बसलेला पाऊस सोमवारी दिवसभर मुसळधारपणे बरसला. सोमवारी सकाळपासून पावसाची संततधार सुरू होती. लांजा तालुक्यातील काजळी, मुचकुंदी, बेनी या नद्या दुथडी भरून वाहत होत्या. तर लांजा शहरात महामार्गावर पाणी साचून वाहनचलकाना मोठा अडथळा निर्माण झाला होता.
संगमेश्वर बाजारपेठ, फुणगूस माखजन बाजारपेठेत पुराचे पाणी
मुसळधार पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील माखजन, कसबा, रामपेठ आदी बाजरपेठामध्ये रविवार संध्याकाळी पुरराचे पाणी घुसण्यास सुरुवात झाली. सोमवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याने बाजारपेठेतील दुकाने आणि घरांचा धोका अधिकच वाढला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही भागातील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येत आहे.
मुसळधार पावसामुळे असावी, सोनवी, शास्त्राr, बावनदीचे पुराचे पाणी जवळच्या गावातून घुसले आहे. सखल भागात असलेल्या रामपेठ, फूणगुस, माखजन आदी बाजारपेठांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. दुकानदारांनी दुकानातील माल सुरक्षित स्थळी हलवला आहे.
देवरूख आणि कसबा मार्ग नायरी गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता
संगमेश्वर देवरुख मार्गावर हनुमान मंदिराजवळ व कसबा बाजारपेठेतील मार्गावर रस्त्यावर पाणी येण्यास सुरुवात झाली होती. येथील पार्याचे प्रमाण वाढल्यास हे दोन्ही मार्ग बंद होण्याची शक्यता आहे.
चिपळूणला पावसाने झोडपले!
चिपळूण तालुक्यात गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा जोर सोमवारी दिवसभर कायम राहिला. सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यत 24 तासात तब्बल 123 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मात्र यामुळे कुठेही नुकसानीची नोंद नाही. रविवारी सायंकाळी मुसळधार पावसात परशुराम घाटात दरड रस्त्यावर आल्याने मुंबई-गोवा महामार्ग दोन तास ठप्प झाला होता. सायंकाळी अडरे-अनारी रस्त्यावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. सोमवारी सकाळपासून दिवसभर पावसाचा जोर कायम राहिला. वाशिष्ठी, शिवनदीच्या पाणीपातळीतही वाढ झाली. पावसाने तालुक्यातील प्रमुख नद्या, नाले तुडूंब भरून वाहत होते. चिपळूण तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 127 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
गुहागरमध्ये 156 मि.मी.पाऊस दुसऱयादिवशी पुन्हा एसटी रूतली चिखलात,
गुहागरात सोमवारी पावसाने वादळी वाऱयासह हजेरी कायम ठेवली. तालुक्यातील पडवे येथे वसंत गणपत राऊत यांच्या चार म्हशी नदीच्या प्रवाहात वाहून गेल्या. त्यातील एकीचा मृत्यू झाला, तर तीन म्हशी जखमी झाल्या आहेत. गुहागर महसूल विभागात 1 लाख 50 हजार रूपये नुकसानीची नोंद करण्यात आली आहे. गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटपन्हाळे कॉलेजच्या नवीन इमारतीसमोर दुसऱया दिवशीही पुन्हा एस्टी बस मातीच्या भरावात रूतली. याठिकाणी ठेकेदाराने योग्य सूचना फलक न लावल्याने वाहनांचे अपघात घडत आहेत.
आबलोली-रत्नागिरी मार्ग ठप्प, बाजारपेठेतही घुसले पाणी
गुहागर तालुक्यातील आबलोली-खोडदे गावांमधून वाहणाऱया वाकी नदीला पूर आल्याने वाहतूक ठप्प झाली होती. गुहागर-आबलोली-रत्नागिरी मार्गावरील आबलोली-वाकी नदीपात्राशेजारील रस्ता, खोडदे बाजार परिसर, मंडप पूल, उंबर पूल यावरून पाणी जात असल्याने वाहतूक सुमारे दोन तास ठप्प झाली होती. यामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या.
मुसळधार पावसाचे पाणी बाजारपेठेतही घुसले होते. आबलोली परिसरात अनेकठिकाणी छोटय़ा-मोठय़ा दरडी कोसळून रस्त्यावर माती आलेली दिसत आहे. गटारे बुजल्याने रस्त्यावरून पाणी वाहत होते. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. मात्र दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यामुळे पाणी ओसरले. बाजारपेठ, रस्ते वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
खेडमध्ये जगबुडी, नारंगी नदीने ओलांडली धोक्याची पातळी
खेड तालुक्यात रविवारपासून थैमान घालणाऱया पावसाचा जोर सोमवारी दिवसभर कायम राहिल्याने जगबुडी व नारंगी नद्यांनी दुपारच्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली. नगर प्रशासनानेही नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत सावध केले. सायंकाळपर्यंत पावसाचे धुमशान सुरूच होते. जगबुडी व नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडताच साऱया यंत्रणांची तारांबळ उडाली. नारंगी नदी दुथडी वाहू लागल्याने सभोवतालचा परिसर जलमय होऊन भातशेती पाण्याखाली गेली. धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत होऊन बाजारपेठेतही शुकशुकाट पसरला होता. सायकाळी 6.30 च्या सुमारास नारंगी नदीच्या पुराचे पाणी खेड दापोली मार्गावरील सुर्वे इंजिनिअरिंग नजीक घुसल्याने मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती दोन्ही बाजुला शेकडो वाहने रस्त्यार अडकली होती.
दापोलीत एका दिवसात 263 मि.मी.पाऊस
दापोलीत सोमवारी सकाळपर्यंतच्या मागील 24 तासांत 263 मि. मी. पावसाची नोंद करण्यात आली. मात्र तालुक्यात कोणतीही मोठी हानी झाली नसल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले. गेल्या 48 तासात जोरदार पावसामुळे तालुक्यातील नदी, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. पावसामुळे रविवार व सोमवारी दापोली बाजारपेठेत तुरळक वर्दळ होती.
भिंगळोली-समर्थनगर रस्ता पाण्याखाली, संपर्क तुटला! मंडणगड तालुक्यातील भिंगळोली समर्थनगर रस्त्यावर पुराचे पाणी आल्याने काही घरांचा संपर्क तुटला आहे. राष्ट्रीय महामार्ग आंबवडे ते राजेवाडी रोडवर एसटी डेपो ते पंचशील नगरदरम्यान पाणी भरल्यामुळे वाहतूक खोळंबली. तालुक्यात रविवारी 24 तासांत सरासरी 152 मि. मी., तर आतापर्यंत एकूण पाऊस 1541 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. याव्यतिरिक्त तालुक्यात कुठेही पडझड अथवा पाणी भरले नसल्याचे तहसील कार्यालयाकडून सांगण्यात आले