-राजारामचे संचालक दिलीप उलपे
प्रतिनिधी / कसबा बाबडा
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या कारभारावर सभासद खुश आहेत. कारखान्याकडून सुरू करण्यात आलेल्या विविध योजना व अनुदानांचे लाभ घेणूयांची संख्या वाढते आहे. ही वाढती संख्या म्हणजेच कारखान्यावर व पर्यायाने व्यवस्थापनावरचा सभासदांचा वाढता विश्वास ! त्यामुळे विरोधी आघाडीला समोरची निवडणूक अवघड वाटत असलेने त्यांच्या पायाखालची माती सरकलेली आहे. याच वैफल्यग्रस्त मानसिकतेतून त्यांनी एक पत्रक छापून लोकांमध्ये वाटायला सुरुवात केली आहे. अशी टिका संचालक दिलीप उलपे यांनी केली आहे.
विरोधक व त्यांच्या बगलबच्चांनी शेतकरी संघ मोडला, बाजार समितीचं वाटोळं केलं, सप्तगंगा कारखान्यातून सहकार संपवला आणि आता या लोकांनी राजाराम कारखान्यावर बोलणे म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज को !’ अशातला प्रकार आहे.. तोंडाला येईल तसे आरोप करून, अपप्रचार करून या कारखान्याच्या पावित्र्याला आणि सभासदांच्या हक्काला कोणीच धक्का लावू शकत नाही. सभासद शेतकयांच्या सेवेसाठी इथे सत्तारूढ आघाडीच पुन्हा विजयी होईल, कारण राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या लोकत्तर विचारातून आणि राजाराम महाराजांच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या या कारखान्याच्या स्वाभिमानी सभासदांनी सुर्याजी पिसाळाच्या प्रवृत्तीला याआधी कधी ही थारा दिलेला नाही आणि इथून पुढेही देणार नाहीत ही काळÎा दगडावरची पांढरी रेघ आहे. असे उलपे यांनी पत्रकात म्हटले आहे.
यावेळेस पॅनल आलं नाही तर पुन्हा संधी नाही.’ असे विरोधी आघाडीचे नेते मागील निवडणुकीत म्हणाले होते पण इतक बोलूनही सभासदांनी त्यांना नाकारले. मग आता त्या घोषणेच पुढे काय ? का नेहमीप्रमाणे प्रत्येक निवडणुकीत येऊन राणा भिमदेवी पोकळ वल्गना करावयाची आणि एवढंच बोलून जायचं अशातला काही प्रकार होता का ? असा सवाल उलपे यांनी केला आहे.
छत्रपती राजाराम कारखान्याकडून सभासदांसाठी विविध योजना सातत्याने चालू असतात. यापूर्वी सभासद शेतकऱयांना बी बियाणे, तणनाशके, किटकनाशके, बोअरवेल खुदाई, ठिबक सिंचनसाठी अनुदान देणेत आलेले आहे. इतकेच नव्हे तर शेकडो शेतकऱयांसाठी कृषी महाविद्यालयामध्ये क्षेत्रभेटीचा उपक्रम देखील कारखान्याने राबविला होता. तेव्हा कुठली निवडणूक होती? याआधीही केवळ आणि केवळ राजकारणासाठी कारखान्याच्या गाडीअड्डÎाच्याजमिनीवर आरक्षण टाकून कारखान्याला पर्यायाने सभासदांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न आमच्या विरोधकांनी केला होता आणि आजही सभासदांच्या लाभदायक योजनांना विरोध करून ते सभासदविरोधी भूमिका घेत आहेत. हे कारखान्याचा स्वाभिमानी सभासद पुर्णत: जाणून आहे.