सावकर मादनाईक, जालंदर पाटील यांची उघड नाराजी, शेट्टींना स्वाकियांचेच आव्हान
प्रतिनिधी / कोल्हापूर
बारामतीच्या गोविंद बागेत राजू शेट्टी यांनी आमदारकी सोबत आमरसचा चाखलेली गोडी काही तासातच कडवट होवू लागली आहे. आमदारकीवर पूर्वाश्रमीच्या स्वकियांनी आसूड ओडल्यानंतर आता स्वकियांच्याकडूही सडकून टीका होवू लागली आहे. शेट्टी यांचे खंदे समर्थक सावकर उर्फ अनिल मादनाईक यांनी कार्यकर्त्यांनी अजून किती सहन करायच, शेट्टी यांनी कार्यकर्त्यांची तिलांजली दिली आहे. अशा तिखट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष प्रा जालंदर पाटील यांनी सावकरांच्या या सुरातसूर आळवला. आम्हा दोघांपैकी एकाला संधी मिळेल असा विश्वास होता मात्र तसे घडले नाही. असे पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे स्वाभिमानी कार्यकर्तेही साहेबांनी चुकच केली अशा शब्दात उघडनाराजी व्यक्त करु लागले आहेत.
महाविकास आघाडीच्या कोटय़ातून विधान परिषदेवर स्वाभिमानीला संधी देण्यात आली. राजू शेट्टी दिलदार आहेत. महायुतीच्या काळात त्यांनी रविकांत तुपकर यांना वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्षपद तर सदाभाऊ खोत यांना कृषी राज्यमंत्रीपद दिले होते. शेट्टी यांनी स्वतासाठी काहीही न घेता कार्यकर्त्यांना संधी दिल्याने स्वाभिमानी कार्यकर्त्यांमध्ये शेट्टी यांच्या प्रति वेगळा आदर होता. मात्र महाविकास आघाडी सरकरामध्ये कार्यकर्त्यांला संधी न देता स्वताःहून आमदारकी घेतल्याने टीकेचे धनी व्हावे लागत आहे. सावकर मादनाईक यांनी उघड नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले मी व जालंदर पाटील यांनी कार्यकर्त्याला संधी द्यावी असे सूचवले होते. अपवाद वगळता राज्यभरातील कार्यकर्त्यांचीही हीच भावना होती. मात्र याची कदर शेट्टी यांनी केली नाही. भविष्य़ात चळवळीसाठी काम करु. त्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रा. पाटली यांनी अशीच भूमिका मांडली लॉकडाऊननंतर निश्चितपणे योग्य निर्णय घेवू असे प्रा. पाटील यांनी सांगितले.