पंढरपूर परिसरात शेतकऱ्यांशी साधला सवांद
प्रतिनिधी / कोल्हापूर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी आज सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, चिंचोली, भोसे या भागातील परतीच्या पावसामुळे आलेल्या महापुराने झालेल्या पिकाच्या नुकसानीची पाहणी केली.
पंढरपूर व परिसरात झालेल्या नुकसानीस प्रशासन जबाबदार असल्याचे निदर्शनास आले. उजनी धरणातून सकाळी ५००० क्युसेक व सांयकाळी २.५० लाख क्युसेक पाणी सोडल्यामुळे नदीच्या पात्रातून रात्रीत पाणी बाहेर पडले. यामुळे केळी, भाजीपाला, ऊस, मका या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जमिनी ऊस पिकांसह वाहून गेल्या आहेत.