ऑनलाईन टीम/तरुण भारत
विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा तिढा अजूनही कायम आहे. विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेता येणार नाही असा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह यांच्याकडून पाठवण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांवर निशाणा साधला आहे. ‘राज्यपालांकडून ही अपेक्षा नाहीये. एखादं घटनात्मक पद आपल्याला भरायचं असेल आणि मंत्रिमंडळ शिफारस करतंय. प्रमुख मंत्री जाऊन राज्यपालांना विनंती करतायत आणि राज्यपाल ते पद भरू देत नाही, याचा अर्थ राज्यपाल राजकारण करतायत. ते ज्या पक्षातून आले आहेत, त्या पक्षाच्या दबावामुळे हे राजकारण ते करतायत. महाराष्ट्राच्या राज्यपालांनी वारंवार ज्या भूमिका घेतल्या आहेत, त्या कायदा आणि घटनेचा भंग करणारी भूमिका आहेत.’
“राज्यपालांकडून ही अपेक्षा नाही. मंत्रीमंडळाच्या शिफारसीनंतरही ते पद भरू दिले जात नाही म्हणजे राज्यपाल राजकारण करत आहेत. ज्या पक्षातून ते आले आहेत त्यांच्या दबावामुळे हे राजकारण सुरु आहे. राज्यपाल विरुद्ध सरकार असा संघर्ष अनेक राज्यात सुरु आहे. महाराष्ट्रात राज्यपालांनी आणि त्यांच्या पक्षाने हा संघर्ष ज्या पातळीवर नेऊन ठेवला आहे याची इतिहासात काळ्या अक्षरात नोंद होईल,” असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
पुढे राऊत म्हणाले की, ‘महाराष्ट्रात ज्या पातळीवरती हा संघर्ष राज्यपाल आणि त्याच्या पक्षाने नेऊन ठेवलाय. इतिहास याची काळ्या अक्षरात नोंद होईल, हे लक्षात घ्या. राज्यपालांनी ही भूमिका कायदा आणि घटनेचा भंग करणारी आहे. अशा घटना भंग करणाऱ्या व्यक्तीला पदावर ठेवणे किंवा पदावर राहू देणे आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या बहुमतातल्या सरकारला अडचणी निर्माण करणं हे सातत्याने आणीबाणीची आठवण करू देणाऱ्या केंद्र सरकारला शोभत नाही.’