ऑनलाईन टीम / पुणे :
राज्यातील अंतिम वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द न करण्याच्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भूमिकेचा एनएसयुआयने निषेध केला असून, कोश्यारी यांना हटवण्याची मागणी राष्ट्रापती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली आहे.
राज्यात कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या काळजीपोटी मुख्यमंत्र्यांनी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, त्याच वेळी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ कायद्याकडे बोट दाखवत परीक्षा रद्द करणे योग्य ठरणार नाही, अशी भूमिका कोश्यारी यांनी घेतली. त्यांच्या या भूमिकेमुळे विद्यार्थ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. राज्यपाल दुटप्पी भूमिका घेत असल्याची टीका एनएसयूआय चे प्रदेशाध्यक्ष अमीर शेख यांनी केली.