पुणे/प्रतिनिधी
१६ ऑगस्टपासून राज्यात बहुतांश भागात पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत हवामान विभागाकडून देण्यात आले आहेत. कोकण विभाग आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागात सध्या हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होत आहे. मात्र, बंगालच्या उपसागरामध्ये सध्या कमी दाबाचा पट्टा तयार होत असल्याने त्याचा परिणाम राज्यावरही होणार आहे. त्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविला जात आहे.
दरम्यान, हवामान विभागाने राज्याच्या बहुतांश भागात १६ ऑगस्टपासून पाऊस पुन्हा सक्रिय होण्याचे संकेतदिले आहेत. विदर्भात काही ठिकाणी मुसळधार, तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही भागांत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांसह पावस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.