ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीकरण सुरु आहे. पण लसीच्या कमतरतेमुळे लसीकरणाची गती मंदावली आहे. याच बरोबर राजधानी नवी दिल्ली येथे ही १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लसीकरण साठ्या अभावी थांबवावे लागले आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ट नेते व देशाचे माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चितंबरम यांनी केंद्र सरकारने राज्यांना लसीचा साठा असल्यास दररोज लसींची संख्या का कमी होत आहे ? याचे कारण जनतेला समजावून सांगावे, असे म्हटले आहे. चितंबरम यांनी यांनी रविवार दि. २३ मे रोजी सोशल मिडीयाद्वारे हा सवाल केला आहे.
“केंद्राचे म्हणणे आहे की राज्यांकडे कोरोना लसींचे १. ६ कोटी डोस उपलब्ध आहेत. याचवेळी दिल्ली आणि तेलंगणासह अनेक राज्यांनी १८ ते ४४ वयोगटातील लसींची कमतरता असल्याचे स्पष्ट करत लस देणे बंद केले आहे. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आणि दिल्ली मुख्यमंत्री यांचे निवासस्थानांमधील अंतर किती आहे ? दोघे का भेटू शकत नाहीत आणि कोणीही आपला डेटा बरोबर आहे याची खात्री करुन दुसर्याला का समजू शकत नाही ? ” असे ही त्यांनी विचारले आहे.