भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा आरोप
प्रतिनिधी / कोल्हापूर
देशाच्या निम्मे कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. त्याच प्रमाणात राज्यातील बळींचीही संख्या आहे. असे असताना राज्यातील परिस्थीत चांगली कशी असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. मुंबई रुग्णांना बेड मिळत नाहीत. वेळेवर रुग्णवाहिका मिळत नाही, अशी टिका केली. तर संजय राऊत यांनी पंतप्रधानांना काही प्रश्न विचारले आहेत. याकडे लक्ष वेधले असता त्यांनी ते देवालाही प्रश्न विचारतील असा टोला लगावला.