वार्ताहर/ रायबाग
राज्यात सध्या ड्रग्जची प्रकरणे मोठय़ा प्रमाणात उघडकीस येत आहेत. त्यामुळे तपास संस्थांनी या प्रकरणाची पाळेमुळे खणून या बेकायदेशीर व्यवहाराशी निगडीत असणाऱया सर्व संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन श्रीरामसेनेच्यावतीने रायबागच्या तहसीलदारांना देण्यात आले. निवेदनात, गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्जचा व्यापार वाढवून तरुण पिढी उद्ध्वस्त केली जात आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा संपूर्ण तपास करून या रॅकेटमधील सर्वांवर कडक कारवाई करावी व राज्य नशामुक्त करावे, असे नमूद केले आहे.
यावेळी जयदीप देसाई, शिवानंद बंते, सिद्धू देसाई, सुनील सौंदलगी, अप्पू पोवार, श्रीनाथ जाधव, सूरज बकरे, विजय माने, पिंटू भोसले, मुकुंद होसकोटे, सुधीर हवालदार, अजित सुतार आदी उपस्थित होते.