गोरक्षा अभियानाचे हनुमंत परब यांचा आरोप : बकरी ईदच्या दिनी गोहत्या झाल्यास सरकार जबाबदार
वाळपई / प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाने राज्यांमधील बेकायदेशीर कत्तलखाने बंद करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्याची अंमलबजावणी गोवा सरकारने केलेले नाही . यामुळे राज्यात वेगवेगळय़ा भागांमध्ये मोठय़ा प्रमाणात कत्तलखाना सुरू आहेत. या कत्तलखान्या मधून बेकादेशीर गुरांच्या हत्या होत असून सरकार याबाबत पूर्णपणे बेफिकर असल्याचा आरोप गोरक्षा अभियानाचे कार्यकर्ते हनुमंत परब यांनी केला आहे. शनिवारी साजरा करण्यात येणार असलेल्या बकरी ईद दिनी गोवंश हत्या होण्याची शक्मयता नाकारता येण्यासारखी नाही .
कारण सध्यातरी बेळगावच्या भागांमधून मोठय़ा प्रमाणात गुरांची आयात गोव्यामध्ये होऊ लागली आहे. मात्र पशुवैद्यकीय खात्याने पशुवैद्यकीय अधिकाऱयाची सीमेवर करण्यात आलेली नियुक्ती यासंदर्भात पूर्णपणे निष्काळजीपणा होत असल्याचा आरोप हनुमंत परब यांनी केला आहे. शुक्रवारी संध्याकाळी वाळपईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत हनुमंत परब यांनी बकरी ईद दिनानिमित्त खास अधिकाऱयांची नियुक्ती सीमेवर करावी अशा प्रकारची मागणी केली आहे . त्याच प्रमाणात राज्यातील पोलिस यंत्रणा अत्यंत सक्षम करून बेकायदेशीर गोहत्या होणार नाही याची विशेष काळजी घेण्याचे विनंती करण्यात आली आहे . सदर पत्रकार परिषदेत पुढे बोलताना हनुमंत परब यांनी सांगितले की बेकायदेशीर कत्तलखाने व गोहत्या संदर्भाचे निवेदन सत्तरी व डिचोली उपजिल्हाधिकाऱयांना सादर केलेले आहे . मात्र ज्या पद्धतीने कारवाई होणे गरजेचे होते .त्यामध्ये पूर्णपणे अपेक्षाभंग झालेला आहे .2008 साली मुंबईच्या उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावेळी सदर न्यायालयाकडून बेकारीची कत्तलखाने बंद करण्याची निर्देश देण्यात आले होते. मात्र त्याची अंमलबजावणी अजून पर्यंत गोव्यात झालेली नाही .यामुळे मोठय़ा प्रमाणात गोहत्या वंश बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले .भागातील बेकायदेशीर गुरांच्या हत्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की गेल्या दोन वर्षापासून बकरी ईद दिनानिमित्त मोठय़ा प्रमाणात गोवंश हत्या होत आहे. गतवषी उस्मान खान यांनी बेकायदेशीर गुरांं®ााr हत्या करून यासंदर्भाचे अवयव एका नारळाच्या बागायतीमध्ये पुरली होती. असे असताना त्यांना तडीपार करणे गरजेचे होते .मात्र तसे न करता पोलिस यंत्रणा ही बाब अत्यंत निष्काळजीपणाने घेत असल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला .बकरी ईद दिनानिमित्त बेकायदेशीर हत्या झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. यामुळे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत सभापती व आमदारांनी यामध्ये गांभीर्याने लक्ष देऊन यासंदर्भात प्रकार होणार नाही याची विशेष दखल घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे.