खाजगी पॅथोलॅबशी चर्चा सुरु : मुख्यमंत्री
प्रतिनिधी /पणजी
राज्यात रेल्वेमार्गे मोठय़ा प्रमाणात येणाऱया बिगरगोमंतकीय मजूर आणि अन्य लोकांची स्थानकांवरच कोविड तपासणी करण्याच्या दृष्टीने सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी खाजगी पॅथोलॅब चालकांशी बोलणी सुरू केली आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
कोरोना महामारीच्या संकटात बेरोजगार बनलेल्या मजूरवर्गाने काही महिन्यांपूर्वी आपल्या घरची वाट धरली होती. मात्र आता हे संकट बऱयाच प्रमाणात निवळले असून बाधित तसेच बळींची संख्याही नियंत्रणात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर आपापल्या गावघरी गेलेले खास करून मजूर लोक पुन्हा गोव्यात परतू लागले आहेत.
स्थानकांवर तपासणी करणे बनेतय अवघड
राज्याच्या सीमा अद्याप बंद असल्या तरीही रेल्वेमार्गे गोव्यात येणे शक्य बनले आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा प्रमाणात लोक गोव्यात दाखल झाले आहेत. चार दिवसांपूवर्ग्नी तर दोन रेल्वेद्वारे एका दिवशी हजारभर लोक मडगाव आणि अन्य स्थानकांवर उतरले होते. त्यामुळे त्यांची तपासणी करण्याचे मोठे आव्हान तेथील अधिकाऱयांसमोर उभे ठाकले होते. त्यातून अनेकजण तपासणी न करताच आडमार्गाने स्थानकाबाहेर पोहोचले होते, अशीही चर्चा होती.
राज्यात विमानमार्गे येणाऱया प्रवाशांची तळावरच तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे. रेल्वे वा बसस्थानकांवर अशी व्यवस्था नाही. त्यामुळे शेकडोच्या संख्येने एकाचवेळी उतरणाऱया प्रवाशांची तपासणी करणे आरोग्य कर्मचाऱयांसाठी अवघड बनते.
कोरोनाबाधितांचा गोवा प्रवेश टाळणार
या परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे सरकारने राज्यातील विविध प्रमुख रेल्वे स्थानकांवर खाजगी पॅथोलॅब चालकांकडून तपासणी केंद्रे स्थापन करण्याचा विचार चालविला आहे. त्यादृष्टीने काही पॅथोलॅब चालकांकडे चर्चा सुरू केली आहे. लवकरच या निर्णयास अंतिम स्वरूप देण्यात येणार असून त्यानंतर प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणे शक्य होणार आहे. त्यामुळे कोरोनाबाधित प्रवाशी राज्यात प्रवेश करणे टाळता येणार आहे.
दोन्ही डोस घेतलेल्यांनाच गोव्यात प्रवेश
सध्या राज्यातील कोविड स्थिती नियंत्रणात आली आहे. बाधितांची संख्या बऱयाच प्रमाणात घटली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. त्याचबरोबर कोविडचे दोन्ही डोस घेतलेल्या पर्यटकांना गोव्यात प्रवेश देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. राज्यात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत जुलैच्या अंतापर्यंत पहिला डोस पूर्तीचे उद्दीष्ट 100 टक्के पूर्ण होईल, असा विश्वासही डॉ. सावंत यांनी व्यक्त केला.