प्रतिनिधी/ बेंगळूर
प्रधानमंत्री किसान योजनेंतर्गत राज्यातील 52.50 लाख शेतकऱयांच्या खात्यावर 1049 कोटी रुपयांचा पहिला हप्ता रविवारी जमा करण्यात आला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी दिली. शेतकऱयांना अर्थिक सुरक्षा पुरविण्यासाठी ही योजना प्रभावी असल्याचे त्यांनी ट्वीटरद्वारे कळविले आहे.
राज्यातील शेतकऱयांच्यावतीने पीएम किसान योजनेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मी आभार मानतो. 1049 कोटी रुपयांचा पहिला हप्ता राज्यातील 52.50 लाख शेतकऱयांच्या खात्यात जमा केला जात आहे. या योजनेमुळे शेतकऱयांची अर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. राज्यातील 52.50 लाख शेतकरी कुटुंबांना फायदेशीर ठरलेल्या या योजनेंतर्गत गतवर्षाच्या तीन हप्त्यातील पहिल्या हप्त्यासाठी 1049 कोटी रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंजूर केले आहेत, असेही मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी सांगितले.