मुंबई / ऑनलाईन टीम
राज्यातील कोरोना संकट घट्ट होत असताना त्या तुलनेत राज्याची आरोग्य यंत्रणा तीतकीच सक्षम असणे अत्यावश्यक आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील आरोग्य विभागात तब्बल १६ हजार पदांची भरती प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
कोरोना काळात राज्याच्या आरोग्य यंत्रणा काही ठीकाणी अपुरी पडत असल्याचे स्पष्ट झालेलं आहे. तसेच कोरोनाच्या लॉकडाऊन काळात अनेकांचे रोजगार गेल्याने राज्यातील नागरिकांच्या रोजी- रोटीचा प्रश्न निर्माण झाला असल्याने यासाठी ही दिलासादायक बाब आहे. यामध्ये ‘क’ आणि ‘ड’ वर्गातील एकूण १२ हजार पदे, ब वर्गातील २ हजार पदे आणि २ हजार तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. अल्पावधीत प्रशासनाची निर्णय प्रक्रिया पार पाडत भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.
पुढील निर्णय घेण्याचे पूर्ण अधिकार आरोग्य विभाग, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना देण्याचा ठराव मंत्रिमंडळ बैठकीत झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली तसेच रुग्णसेवेशी संबंधित पदांची १०० टक्के भरती करण्याची आवश्यकता आहे. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्या स्तरावर हा निर्णय येत्या २ ते ३ दिवसांत घेतला जाईल. तसेच. तातडीने परीक्षा घ्याव्यात असे देखील ठराव आला आहे असं आरोग्यमंत्री टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.