ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात एक कोटीहून अधिक लोकांनी कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसकडे पाठ फिरवली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासंदर्भात आकडेवारी दिली आहे.
राज्यात 87 टक्के नागरिकांची लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर 55 टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. पहिला डोस घेऊन दुसऱ्या डोसमधील अंतर पूर्ण करुनही अद्याप लसीकरण केंद्रावर न पोहचलेल्या नागरिकांची संख्या 1 कोटीहून अधिक आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील 92 लाख नागरिकांनी कोविशिल्ड तर 13 लाखांहून अधिक नागरिकांनी कोवॅक्सिन लस घेतली आहे.
मुंबईत मात्र 80 टक्क्यांपेक्षा जास्त लोकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. तर 7 लाखांहून अधिक लोकांनी अद्याप दुसऱ्या डोसचे अंतर पूर्ण होऊनही लस घेतलेली नाही. लसीकरणाचा आकडा वाढावा म्हणून राज्य सरकारने दुकाने, मॉल, सर्व सरकारी कार्यालये, चित्रपटगृह, हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये जाण्यापूर्वी तसेच लसीचे सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्यासाठी लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक केले आहे.