बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या आणि मृत्यूची संख्या वाढत असताना बेंगळूरमधील डॉक्टरांनी राज्य सरकारने महामारीविरूद्ध लढा देण्यासाठी आपल्या रणनीतीची पुनर्रचना करण्याची गरज असल्याचं म्हंटल आहे. कोरोनाला तोंड देण्यासाठी, जादा ऑक्सिजन बेड, आयसीयू सुविधा आणि व्हेंटिलेटर यांची आवश्यकता असल्याचे म्हंटले आहे.
रीगल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक (एमडी) डॉ. सूरिराजू व्ही म्हणाले, “लक्षणे नसलेल्या रुग्णांना बेडची गरज नसून त्यांच्यावर घरीच उपचार केले जाऊ शकतात, परंतु बहुतेक लक्षणे असलेल्या प्रकरणांमध्ये ऑक्सिजन पुरवठा, आयसीयू आणि वेंटिलेटर सारख्या सुविधांची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.