गोवा फॉरर्वडतर्फे डीजीपींना निवेदन सादर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी /पणजी
राज्यात गुन्हेगारी मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. विशेस्तः महिला आणि मुले असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. गोवा महिलांसाठी सुरक्षित राहिले नसल्याचा दावा गोवा फॉरर्वड महिला समितीने केला आहे. पोलिसांनी त्वरीत उपाययोजना न केल्यास पोलीस मुख्यलाया समोर धरणे धरणार असल्याचा इशारा त्यांनी सोमवारी त्यांनी पोलीस महासंचालक मुकेश कुमार मिणा यांना या बाबत निवेदन सादर केले आहे.
पोलीस महिसंचालकांना निवेदन सादर केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोवा फॉर्वड महिला समितीच्या उपाध्यक्ष ऍड. अश्मा सय्यद यांनी वरील माहिती दिली आहे, यावेळी त्यांच्या सोबत सदस्य लोरीन डायस, म्हापसा नगरपालिकेच्या माजी नगरसेवक पुजा नाईक, कोलवाळे जिल्हा पंचायत सदस्य कवीता कांदोळकर, व अन्य उपस्थित होते. राज्यातील महिला आणि मुला सोबत जे गुन्हेगारी प्रकार होत आहेत त्याच्यावर त्वरीत उपाय योजना करा ज्यांच्या सोबत घटना घडलेल्या आहेत त्या गुन्हेगारांना त्वरीत अटक करून त्यांना पीडितांना तसेच त्यांच्या कुटुंबियांना न्याय द्या अशी मागणी ऍड. अश्मा सय्यद यांनी केली आहे. पुढे बोलताना अडॅ, अश्मा म्हणाल्या की आच्छर्याची बाब म्हणजे राज्यात महिलांवरील गुन्हे राज्यात वाढलेले नसल्याचे पोलीस महासंचालक सांगत आहे. एकूणच पोलीसही सरकारच्या तालावर नाचत असून सर्वसामान्य लोकाना फसविण्याचा प्रकार करीत असल्याच ऍड. अश्मा म्हणाल्या. राज्यात जे प्रकार घडत आहेत त्याला अप्रत्यक्षपणे पालकांनाच जबाबदर ठरवून पालकांनीच आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला पाहिजे असेही पोलीस महासंचालकांनी सांगितले आहे. मुले ही मुलेच असून ती निश्पाप असतात राज्यात जे प्रकार घडत आहेत ते त्वरीत बंद व्हायला पाहिजे अन्यथा गोवा फॉर्वड महिला समिती रस्त्यावर उतरणार असल्याचा इशाराही ऍड. अश्मा यांनी दिला आहे.