प्रतिनिधी /पणजी
राज्यात काल मंगळवारी सर्वत्र उशिरा जोरदार पाऊस झाला. हा पाऊस फोंडा, तिसवाडी, सत्तरी, डिचोली, बार्देश, पेडणे आणि सायंकाळी उशिरा पावसाने पणजीत जोरदार हजेरी लावली.
त्याचबरोबर रात्री उशिरा वास्को व आसपासच्या परिसरात पर्जन्यवृष्टी झाली. गेले काही दिवस उकाडय़ामुळे हैराण झालेल्या जनतेला जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला. मात्र सत्तरी, सांगे, फोंडा, डिचोली, पेडणे तसेच बार्देश आदी तालुक्मयात पडलेल्या पावसाचा परिणाम आंबा आणि काजू पिकावर होण्याची शक्मयता शेतकरी वर्गाने व्यक्त केली. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप चालू होती. हवामान खात्याने राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता व्यक्त केली होती.