बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात भाजपमध्ये नेतृत्व बदलल्याच्या अंदाजामुळे खासकरुन पक्षात राज्यात सरकार स्थापनेसाठी मदत केलेल्या आणि दुसऱ्या पक्षातून भाजपमध्ये दाखल झालेल्या मंत्र्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे.
दरम्यान, जद (एस) कॉंग्रेसचे सरकार पडण्याकरिता काँग्रेस पक्षांतील सोळा आमदारांनी विधानसभेचे सदस्यत्व सोडले आणि भाजपमध्ये प्रवेश केला आणि मुख्यमंत्री बी.एस. यांच्या नेतृत्वात भाजपचे सरकार स्थापन करण्यास मदत केली. येडियुरप्पा यांनी मंत्रिमंडळ विस्तारात त्यापैकी १२ जणांना मंत्रीपदी संधी देण्यात आली. त्यापैकी सरकारी नोकरीच्या बदल्यात गोककचे आमदार रमेश जारकीहोली यांनी एका महिलेकडून लैंगिकशोषण केल्याच्या आरोपामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.
येडियुरप्पांच्या नेतृत्वात मंत्री असलेले आमदार राज्यात नेतृत्व बदल झाल्यास त्यांना त्यांच्या मंत्रिपदाबद्दल चिंता असल्याचे म्हटले जाते. कारण त्यांना येडियुरप्पा यांनी भाजपात आणले होते आणि ते त्यांच्याशी निष्ठावान आहेत.