पणजी /प्रतिनिधी
पावसाची माघारी फिरकण्याची शक्मयता कमी झाली असून आगामी तीन दिवसात राज्यात सर्वत्र जोरदार व त्यानंतर पुढील दोन दिवस मध्यम प्रमाणात पावसाची शक्मयता हवामान खात्याने वर्तविली आहे.
सध्या पूर्वेकडून जोरदार पाऊस वाढत असून तो ऑक्टोबर अखेरपर्यंत पडत राहण्याची शक्मयता दाट आहे त्यामुळे या महिन्याअखेरीस पर्यंत पावसाचा प्रभाव राहणार आहे यंदा अगोदरच ज्यादा पडलेला पाऊस मान्स?नोत्तर देखील आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढण्याची शक्मयता आता वाढली आहे पुढील दोन दिवसात राज्यात सर्वत्र मुसळधार व त्यानंतर मध्यम प्रमाणात पाऊस पडेल असे हवामान खात्याने म्हटले आहे तथापि सध्या बंगालच्या खाडीत तयार होत असलेले वातावरण पाहता हा पाऊस 30 ऑक्टोबर पर्यंत माघारी परतलेल असे वाटत नाही
मंगळवारी राज्यात सर्वत्र मध्यम तर काही ठिकाणी हलक्?या स्वरूपाचा पाऊस झाला पणजी मध्येआज देखील जोरदार पाऊस पडेल