बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी सध्याच्या पोलीस दलाला फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत असे म्हणून त्यांनी रिक्त पदांवर पोलीस विभाग भरती करणार असल्याचे म्हंटले आहे.
पोलीस विभागातील हजारो पदे रिक्त असल्याचे सांगून विधानसौदच्या मेजवानी सभागृहात उत्तम प्रकारे सेवा बजावणाया पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी मुख्यमंत्री पदक दिले. दरम्यान भरतीसाठी विभागाने प्रस्ताव पाठविला आहे. सरकारने हा प्रस्ताव गांभीर्याने घेतला आहे. पोलीस दलाची संख्या कमी झाल्यामुळे सध्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांना २० तासांपेक्षा जास्त काम करावे लागत आहे. यावेळी पोलीस वगळता इतर विभागांचे वाटप बजेटमध्ये कमी होईल. कोरोनामुळे सरकारला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला आहे.
दरम्यान पोलीस गृह योजनेंतर्गत अडीच हजार कोटी रुपये खर्च करून सरकारकडून ११ हजार आधुनिक निवासी वसाहती बांधल्या जात आहेत. सन २०२५ पर्यंत राज्यात सर्व पोलीस कर्मचार्यांना राहण्याची सोय करण्यात येणार आहे. यासाठी दरवर्षी दोन हजर घरे बांधली जातील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्रीयेडियुरप्पा यांनी निर्भय योजनेंतर्गत महिलांना सुरक्षा देण्यासाठी ६६२ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपत्कालीन सेवा करण्यासाठी १५० वाहने सोडली. ११२ हेल्पलाइन सुरू केली. महिलांचे रक्षण करणे, शांतता राखणे, कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे कर्तव्य आहे.
यावेळी गृहमंत्री बसवराज बोम्माई सरकारचे मुख्य सचिव रवी कुमार, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव रजनीश गोयल, पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.