बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे प्रमाण कमी कमी होत आहे. आरोग्य विभागाने जारी केलेल्या बुलेटिननुसार शनिवारी राज्यात ४९० कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ३८९ रुग्ण कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले. तसेच कोरोनामुळे ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान राज्यात सध्या ५,९७८ जणांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत १२,२९२ रुग्णांचा बळी गेला आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या ही बेंगळूर शहरी जिल्ह्यात आहेत. दरम्यान शनिवारी जिल्ह्यात २७८ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर २०६ रुग्णांनी कोरोनावर विजय मिळावीत रुग्णालयातून घरी परतले. जिल्ह्यात सध्या कोरोना उपचारात असणाऱ्या रुग्णांची संख्या ४,२५७ आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत ४,४४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.