अचूक बातमी “तरुण भारत” ची, सोमवार, 24 मे 2021, सकाळी 11.20
● रविवारी रात्री अहवालात 2,648 बाधित ● पुन्हा उच्चांकी बाधित वाढ ● पॉझिटिव्हिटी थोडा घसरला ● पॉझिटिव्हिटी रेट आला 18.33 वर ● एकूण नमुने तपासले 1,4356● लसीकरण गती मंदावलेलीच ● नियम पाळा, संसर्ग साखळ्या तोडा
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात लॉकडाऊन सुरू केल्यापासून निर्माण झालेली स्थिती गतवर्षीपेक्षा भयंकर आहे. त्यामुळेच गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाउन सुरू असताना आता तो आणखीन सहा दिवस वाढला असून यामध्ये नियम पाळून संसर्ग साखळ्या तोडण्याचे आव्हान जिल्हा समोर आहे. पुणे मुंबई, ठाणे, नाशिक या मोठ्या जिल्ह्यामध्ये बाधित वाढीचा वेग दिलासादायक मंदावला आहे. मात्र जिल्ह्यात गत दोन दिवसात अठराशेच्या पटीत वाढ होत होती. पुन्हा ती दोन हजाराच्या पटीत होत असून रविवारी रात्रीच्या अहवालात बाधितांच्या संख्येने 2,648 अशी उच्चांक नोंदवला आहे.
संसर्ग साखळ्यांनी जिल्हा हैराण
लॉकडाऊन होण्याच्या अगोदर जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची स्थिती एवढी गंभीर नव्हती मात्र नंतर ज्या पद्धतीने बाधित वाढीचा वेग वाढला आणि पुन्हा जिल्हा पॅनिक झाला आहे. सातारा, फलटण, कराड, खटाव, माण, कोरेगाव, वाई या तालुक्यात कोरोनाने कहर केला आहे. गेल्या दोन-तीन दिवसात महाबळेश्वर, जावली, पाटण तालुक्यामध्ये वेग मंदावत आलेला दिसतोय. मात्र हॉटस्पॉट ठरलेले सातारा, फलटण, कराड, खटाव, कोरेगाव, मान या तालुक्यांना सावरण्यासाठी आता कडक लॉकडाऊन पाळण्याशिवाय गत्यंतर नाही. येत्या सहा दिवसात जिल्हावासियांनी कडक नियम पाळून कोरोनाला हरवण्यासाठी सज्ज व्हायला हवे.
पॉझिटिव्हिटी रेट खाली घसरला
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट तपासण्यांचे एकूण आकडे पाहता खालील असल्याचे अहवालात दिसून येत आहे रविवारी रात्री चा अहवाल सोमवारी सकाळी आला यामध्ये एकूण 14 356 जणांची तपासणी करण्यात आलेली असून यामध्ये 2648 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे यामध्ये एकूण पॉझिटिव्हिटी रेट 18. 45 असा खाली घसरल्याचे दिसून येत आहे. गेल्या आठवड्यात तो 34 टक्क्यांच्या आसपास होता.
अँटीजन टेस्ट जिल्ह्यात अधिक
जिल्ह्यात अँटीजन टेस्ट वाढवण्यात आल्या असून रविवारी आलेल्या अहवालात एकूण 11, 713 एवढ्या जणांच्या टेस्ट केलेल्या असून यामध्ये 1,814 एवढे जणांचे अहवाल बाधित आलेला आहे. अँटीजन टेस्टमध्ये पॉझिटिव्हिटी रेट 15.43 एवढा राहिला आहे. तर 2,643 जणांची rt-pcr टेस्ट करण्यात आली असून यामध्ये 834 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे त्यामुळे rt-pcr चा पॉझिटिव्हिटी रेट मात्र हाय असून तो 31.46 एवढा आहे.
आता नियम पाळा, कोरोना टाळा
जिल्हात कोरोना संसर्गाच्या तडाक्यात लोक सापडले आहेत. नागरिक नियम पाळतच आहेत. मात्र आता पुढील सहा दिवस पुन्हा कडक लॉकडाऊन पाळून ही जंग पुढे सुरू ठेवायची आणि जिंकायची. यासाठी प्रत्येक शहर, प्रत्येक गाव आणि संपूर्ण जिल्हाभर वैद्यकीय कारणा व्यतिरिक्त कोणीही बाहेर न पडता संसर्ग साखळ्या तोडून कोरोनाला हरवायचं आहे आहे. त्यासाठी सर्वांनी पुन्हा एकजूट बांधा असा संदेश परिस्थिती देत आहे.
रविवारी रात्री 2,648 बाधित
दोन हजारांच्या पटीत सुरू असलेली बाधित वाढ जिल्हावासीयांना अद्याप छळतच आहे. होती. गेल्या दोन दिवसात ती अठराशे खाली आली. गती मंदावल्याचा दिलासा असतानााच शनिवारी रात्रीच्या पुन्हा दोन हजाराच्या पुढे संख्येने बाधित समोर आले आहेत. तर रविवारी रात्री पुन्हा 2,648 अशी उच्चांकी बाधित आकडेवारी समोर आली आहे. मात्र यामुळे भयभीत न होता जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी मला हरवण्यासाठी एकजुटीने प्रयत्न केले पाहिजेत आणि प्रशासनानेही साथ दिली पाहिजे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात एकूण नमुने 6,84,888, एकूण बाधित 1,48,739, एकूण कोरोनामुक्त 1,26,631, एकूण बळी 3,425, उपचारार्थ 18,673
रविवारी जिल्हय़ात बाधित 2083, मुक्त 1,198, बळी 31