प्रतिनिधी/ बेंगळूर
आपला स्वित्झर्लंडमधील दावोस दौरा यशस्वी झाला आहे. याची फलनिष्पत्ती लवकरच दिसून येणार आहे. आगामी दिवसांत राज्यात हजारो कोटी रुपयांची भांडवल गुंतवणूक होणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी व्यक्त केला. दावोस दौऱयामुळे प्रामुख्याने युवा वर्ग आणि शेतकऱयांना अधिक लाभ होणार आहे, असे त्यांनी सांगितले.
दावोस येथील शिखर परिषदेत सहभागी झाल्याबाबतची माहिती देण्यासाठी येडियुराप्पा यांनी शनिवारी गृहकार्यालय ‘कृष्णा’ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. शिखर परिषदेत अनेक उयोजकांनी आपली भेट घेऊन कर्नाटकात भांडवल गुंतवणूकीची इच्छा व्यक्त केली आहे. राज्यात नेमकी किती गुंतवणूक होईल, हे सांगणे शक्य नाही. पण येत्या दिवसांत निश्चितच हजारो कोटींची गुंतवणूक होईल, असा दावा त्यांनी केला.
राज्यातील शिष्टमंडळासमवेत दावोस येथील परिषदेत सहभागी झाल्यामुळे राज्याच्या दृष्टीने अधिक लाभ होणार आहे. अनेक देश आणि कंपन्योशी नवे करार करण्यात आले आहेत. 40 हून अधिक कंपन्या, उद्योजकांशी आपण चर्चा केली आहे. तेथे कंपन्यांना कर्नाटक आकर्षणाचा केंद्रबिंदू होता. त्यामुळे राज्याच्या पॅव्हेलियनला सर्वजण भेटी देत होते. याप्रसंगी मंत्री जगदीश शेट्टर आणि इतर अधिकाऱयांनी उद्योजकांना राज्यात उद्योग स्थापनेसाठी असणाऱया उद्योगस्नेही वातावरण, सुविधांची माहिती दिली, असे त्यांनी सांगितले.
उद्योजक लक्ष्मी मित्तल, अरविंद किर्लोस्कर, महेंद यांच्यासह देश-विदेशातील अनेक उद्योजकांशी आपण चर्च केली आहे. लक्ष्मी मित्तल यांनी राज्यात स्टील कारखाना सुरू करण्याची तयारी दर्शविली आहे. मंत्री जगदीश शेट्टर यांनी दुबईचे राच्या शेख महम्मद यांच्याशीही चर्चा केली आहे. एकंदरीत राज्यात कोणकोणत्या क्षेत्रात गुंतवणुकीच्या संधी आहेत, याची माहिती देण्यात आली आहे. तीन वर्षात राज्यात गुंतवणुकीला प्रारंभ होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
आगामी तीन वर्षात राज्यात नवे औद्योगिक धोरण जारी करण्यात येईल. राज्यात युवा वर्गाला रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याबरोबच औद्योगिकीकरणाद्वारे शेतकऱयांना लाभ मिळवून देण्याचा आपल्या सरकारचा प्रयत्न आहे. जगात प्रथमच सेंटर फॉर इंटरनेट ऑफ एथिकल थिंग्स करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या अनौपचारिक कराराबाबत जागतिक आर्थिक मंचेचे व्यवस्थापकीय संचालक मूरत्तू सोनूमेजू यांनी स्वाक्षरी करून समाधान व्यक्त केले. बेंगळूर बरोबरच हुबळी, शिमोगा, म्हैसूर या भागात उद्योगधंदे स्थापन होणार आहे. बिदरवरून 7 फेब्रुवारीपासून विमानफेऱया सुरू होणार आह। असे येडियुराप्पा यांनी सांगितले.
भू खरेदी कायद्यात करणार दुरूस्ती
राज्यात उद्योगधंदे स्थापनेसाठी अडचण असलेल्या जमीन खरेदीतील समस्या सोडवून औद्योगिक धोरणात बदल करण्यात येणार असून नवे धोरण तयार करण्यात येईल. जमीन खरेदीसाठी उद्भवणाऱया समस्या सोडविण्यासाठी आगामी अधिवेशनात भू खरेदी कायद्यात दुरूस्ती करण्यात येईल. तो कायदा रद्द करणार नाही, असे स्पष्टीकरण येडियुराप्पा यांनी दिले.