बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनामुळे अनेक दिवसांपासून महाविद्यालये बंद आहेत. कोरोनामुळे परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. अनेक दिवसांपासून शाळा, महाविद्यालये बंद असलेल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी शाळा, महाविद्यालये पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. परंतु राज्य सरकारने १८ वर्षावरील विध्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्याशिवाय महाविद्यालये सुरु होणार नसल्याचे म्हंटले होते. यांनतर विद्यार्थ्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करण्यास सुरुवात झाली. दरम्यान, ७ जुलैपर्यंत राज्यात ६५ टक्के पेक्षा जास्त विद्यार्थी आणि सरकारी आणि अनुदानित पदवी महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले आहे.
उच्च शिक्षणमंत्री अश्वथ नारायण यांनी, ७ जुलैपर्यंत राज्यात ६५ टक्के पेक्षा जास्त विद्यार्थी आणि सरकारी आणि अनुदानित पदवी महाविद्यालयांच्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण केले गेले आहेत. एकूण ४,९०,७९९ विद्यार्थ्यांपैकी ३,१३,८९८ विद्यार्थ्यांना लस देण्यात आली असल्याची माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, बेंगळूर विद्यापीठाने ७६.४ टक्के विद्यार्थी आणि कर्मचार्यांना आपल्या कॅम्पसमध्ये लस दिली आहे. बेंगळूर विद्यापीठाच्या विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ७९ टक्के विद्यार्थी व कर्मचारी यांना लस दिली आहे. तर युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजने ७८.३ टक्के आणि युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन ७१.६ टक्के लसी दिली आहे. बेंगळुरू विद्यापीठाचे व्हीसी प्रा. के. आर. वेणुगोपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार वसतिगृहातील ६६ टक्के विद्यार्थ्यांनाही लस देण्यात आली आहे. तसेच “विद्यापीठ पुन्हा सुरू झाल्यावर सुमारे २० टक्के विद्यार्थ्यांना लस देण्याची आमची योजना आहे.” असे ते म्हणाले.