बेंगळूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून नव्या बाधितांचा आकडा 6 हजारांच्या खाली आला आहे. राज्यात शुक्रवारी 5,783 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर दिवसभरात 15,290 जण संसर्गमुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, मागील चोवीस तासांत राज्यात 168 रुग्णांचा बळी गेला आहे.
आरोग्य खात्याने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिननुसार राज्यात आतापर्यंत 27,96,121 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्यापैकी 26,25,447 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. तर आतापर्यंत एकूण 33,602 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू
झाला आहे. राज्यातील विविध इस्पितळे, कोविड केअर सेंटर, होम आयसोलेशनमध्ये अजुनही 1,37,050 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात शुक्रवारी कोरोना पॉझिटिव्हीटी दर 4.05 टक्के इतका होता. तर मृत्यूदर 2.90 टक्के इतका होता. बेंगळूर शहर जिल्हय़ात मागील चोवीस तासांत1,100 नवे रुग्ण आढळून आले तर येथे दिवसभरात 6,160 जण कोरोनामुक्त झाले. तर 39 जण दगावले आहेत. मंगळूर, म्हैसूर, मंडय़ा, हासन या जिल्हय़ांमध्ये मात्र नवे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.