प्रतिनिधी /मडगांव
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली चालणारे भाजपचे सरकार राज्यातील जनतेला कोरोनापासून मुक्त करण्याकरीता योग्य पद्धतीने कार्य करत आहे. तसेच आरोग्यमंत्री विश्वजीत राणे हे सुद्धा उत्तम कामगीरी करत आहे. राज्याला कोरोनापासून मुक्त करण्याकरीता जनतेने सुद्धा सहकार्य करण्याची गरज आहे. सरकारच्या सर्व एसोपीचे पालन जनतेने केले पाहिजे. कोरोनाच्या या महामारीच्या काळात आपण सर्वांनी एकत्रीत येऊन काम केले पाहिजे. राज्यातील 40 आमदारांनी आपल्या मतदारसंघात चांगली कामगीरी केल्यानेच राज्यात कोरोनाचे रुग्ण हळूहळू कमी होत चाललेले आहे. ज्या पद्धतीने गोव्याला पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोमंतकीयांमध्ये क्रांतीची ज्योत पेठवली होती त्याच प्रकारे गोव्याला कोरोनाच्या महामारीपासून मुक्त करण्याकरीता प्रत्येकाने क्रांती घडवून आणण्याची गरज असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी सांगीतले.
मडगाव येथ लोहिया मैदानावर क्रांतीदिनाच्या कार्यक्रमानिमित्त प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले. यावेळी विरोधीपक्षनेते दिगंबर कामत, फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई, कुडतरीचे आमदार आलेक्स रेजीनाल्ड, बाणावलीचे आमदार चर्चील आलेमाव, कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस, नगराध्यक्ष लिंडन परेरा, उपनगराध्यक्ष दीपाली सावळ व इतर मान्यवर उपस्थित होते.
गोव्याल पोर्तुगीजापासून मुक्त करण्याकरीता स्वातंत्र्यसैनिकांना अनेक प्रकारचे त्रास सहन करावे लागले. त्यांच्याच मेहनतीमुळे गोवा पोर्तुगीज्यापासून मुक्त झाला त्यामुळे आपण सदैव स्वातंत्र्यसैनिकांचा आदर केला पाहिजे. राज्य सरकार कृषी क्षेत्रात सुद्धा क्रांती घडवून आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. शेतकऱयांने आपले उत्पन्न वाढवावे यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे उपमुख्यमंत्री कवळेकर म्हणाले.
18 जून 1946 साली डॉ. राम मनोहर लोहिया यांनी गोव्याला पोर्तुगीजापासून मुक्त करण्याकरीता गोव्यात आले होते. त्यांच्या त्या प्रयत्नामुळेच गोव्याला 19 डिसेंबर 1961 रोजी पोर्तुगीजापासून मुक्त झाला. तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या इच्छेनुसार डॉ. राम मनोहर लोहिया यांचा स्मारक मडगाव येथील लोहिया मैदानावर उभारण्यात आला. पुन्हा एकदा राज्यातील जनतेला सध्याच्या सरकारला धडा शिकवण्याकरीता क्रांती घडवून आणण्याची गरज आहे. कारण या सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहिच पडून गेलेले नाही असे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले.
गोंयकार विरोधी सरकारला घरी पाठवून गोंयकारवादी सरकारला सत्तेवर आण्याची गरज : विजय सरदेसाई
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना सरकारने केलेल्या चुकावर बोलणारे लोक आवडत नाही. ते आपल्याला हव्या त्या पद्धतीने निर्णय घेत आहे. अशा प्रकारच्या सरकारला राज्यातील जनतेने धडा शिकवण्याची गरज आहे. तसेच सध्याचे सरकार लोकशाही संपवण्याच्या मार्गावर चाललेले आहे. लोकांनी आता जागृत होऊन गोमंतकीयांच्या विरोधात काम करणाऱया या सरकारला घरी पाठवण्याची वेळ आलेली आहे. तसेच येणाऱया विधानसभेच्या निवडणूकीत गोव्याच्या हितासाठी काम करणाऱया सरकारला सत्तेवर आणावे.