प्रतिनिधी/ म्हापसा
भारत देशात गोवा राज्य हे टुरीस्ट डेस्टनेशी म्हणून ओळखले जाते. ते आम्ही सांभाळून ठेवले पाहिजे. त्यासाठी राज्य सरकार सर्व त्या सोयी सुविधा राज्याला देत आहे. काही समस्या अद्याप आहेतच. जसजशी घरे वाढत आहेत तशी जनतेची मागणीही वाढत आहे. पाण्याची मागणीही तेव्हडय़ाच प्रमाणात वाढत आहे. यासाठी थोडय़ा दिवसानंतर पर्वरीचा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पाणी आम्ही नागरिकांना योग्यरीत्या देणार आहोत. आम्ही पुढील 50 वर्षांचा विचार करीत आहोत. पुढील दिड महिन्यात पाण्याची समस्या सुटेल. जनतेला आम्ही मोफत पाणी देण्याचा प्रयत्नात आहोत. आणि कमी दरातही देण्यास तयार आहोत. सर्वांनी पाणी साभाळून वापरावे. स्वातंत्र्यदिनी राज्यात मोफत पाणी देणार असल्याची घोषणा आम्ही करणार आहोत अशी माहिती म़ुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साळगाव येथे बोलताना दिली.
साळगाव येथे साळगाव ते अटल सेतूपर्यंत रस्ता रुंदिकरण सौंदर्यीकरण व हॉटमिक्स डांबरीकरणाचे रीतसर उद्घाटन केल्यावर मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक बांधकाम मंत्री दिपक पाऊसकर, आमदार जयेश साळगावकर, माजी आमदार दिलीप परुळेकर जिल्हा पंचायत सदस्य कार्तिक कुडणेकर, सरपंच लफिरा फर्नांडिस, जिल्हा सदस्य, रुपेश नाईक, संदीप बांदोडकर, उल्हास मोरजकर, बाबाजी गडेकर, उत्तम पार्सेकर, मुख्य अभियंता गुप्ता, शशिकांत नाईक आदी उपस्थित होते.
वैगवेगळय़ा गोष्टी चालीस लावण्यास आम्ही प्रयत्न करणार आहोत. ‘प्रशासन तुमच्या दारी’ यापद्धतीने आम्ही काम करणार आहोत. राज्याच्या विकासासाठी आम्ही झटणार आहेत. लोकांच्या समस्या पुढे घेऊन आम्ही आलो आहोत त्या जातीने सोडवू असे मुख्यमंत्री म्हणाले.
स्व. मनोहर पर्रीकरांचे स्वप्न पूर्ण होणार- दिपक पावस्कर
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री दिपक पावस्कर म्हणाले, लोकांची 2017 पासून या रस्त्याची पर्यटनदृष्टय़ा दुरुस्त करण्याची मागणी होती. स्व. मुख्यमत्री मनोहर पर्रीकरांनी कंसल्टन नियुक्त केला होता. हा रस्ता अटल कोटीपर्यंत पोहचणार होता. 100 कोटीची निविदा यासाठी काढण्यात आली होती. 13 मीटर रुंदी मिळत नसल्याने हे काम रखडले. सर्व पक्षाच्या जनतेला घेऊन भाजपपुढे जात आहे. येत्या 2022 च्या निवडणुकीपूर्वी तुम्हाला नवीन मार्ग मिळणार आहे. यावेळी क्वॉलिटीगी मेंटेन करण्यात येईल. सरकारने 5 कोटी 72 लाख निविदा आता काढली आहे. 508 किलोमीटर रुंदी आहे मात्र जनतेच्या घरांना त्रास न करता हा र्सता उभारण्यास येईल. हा एक बऱयापैकी चांगला रस्ता होईल असे दिपक पावस्कर यांनी सांगितले.
गोवा राज्यातील पायाभूत विकास करण्यासाठी सरकारी यंत्रणा सदैव झटत आहे. गेली दोन वर्षे कोविड काळात आम्ही खूप कामे केली आहे. आम्ही दुजाभाव करीत नाही. गोवा राज्यात ज्या बेसिक गरजा पाहिजेत त्या जेण्याकडे आम्ही सदैव कार्यशील आहोत. घरात वीज, पाणी, रस्ते मोफत देण्यात आम्ही भर दिला आहे. साळगाव मतदारसंघात पर्यटनदृष्टय़ा हा रस्ता महत्त्वाचा आहे. अतिथी देवो भव म्हणण्याचे काम जनतेचे व सुविधा पुरविण्याचे काम सरकारचे. जनतेला सर्वकाही देण्याचे काम सरकार सदैव देत आहेत. सर्वांना गोव्यात येणाऱयांचे स्वागत करणे आज काळाची गरज आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
पुढील 30 वर्षानंतरही लोकांनी आपले नाव घ्यावे- जयेश साळगावकर
यावेळी साळगावचे आमदार जयेश साळगावकर म्हणाले की, रस्त्याकडे विकास झाला, मात्र गटारही नाही अशी साळागवच्या रस्त्याची परिस्थिती आहे. कोकेरोत साळगाव रस्त्याची पातळी काढायला पाहिजे तसेच येथे गटार योजना करायला पाहिजे. हा रस्ता नोव्हेंबर मध्ये हॉटमिक्स करण्यात येईल. ज्या जागी रस्ता खाली आहे तो प्रथम भरला जाईल. कुणाच्या घरांना आम्ही हानी पोचविणार नाही. स्व. पर्रीकरांनी आम्हाला आश्वासन दिले होते हा आंतरराष्ट्रीय पातळीवर रस्ता बांधून देमार आहे. हा रस्ता आहे तसा करण्यात येईल. ही हेरीटेज आम्ही राखून ठेवणार. पुढील 30 वर्षानंतर लोकांनी म्हटले पाहिजे मुख्यमंत्र्यांच्या सहकार्याने जयेश साळगावकर यांनी हा साळगावचा रस्ता केला होता. येथील पाईपलाईन जुनी आहे ती रस्ता करण्यापूर्वी तात्काळ बदलावी अशी मागणीही यावेळी श्री साळगावकर यांनी केली. रस्त्याबाबत कामात वीजमध्ये साळगाव मतदारसंघ पुढे आहे. विरोधकात असूनही आमती चांगली कामे होतात असे आमदार साळगावकर म्हणाले.