प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे सर्व सण तसेच कार्यक्रमांवर बंदी असताना राज्योत्सवाच्या नावाखाली विविध चौकांमध्ये लाल-पिवळय़ा रंगाच्या कमानी, झेंडे आणि पताके लावण्यात येत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेतून नाराजी व्यक्त होत आहे.
कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कटली आहे. यातच मागीलवर्षी आणि यावषीही पावसामुळे पूर आला होता. त्यामधून जनता सावरण्याचा प्रयत्न करत असताना सरकार मात्र राज्योत्सवाच्या नावाखाली पैसा उधळत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे बेळगाव शहराबरोबरच ग्रामीण भागातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. एकूणच कोरोनाच्या काळात सर्व कार्यक्रमांवर बंदी असताना राज्योत्सव मात्र साजरा करण्यासाठी आटापिटा सुरू असून सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचे चित्र पहायला मिळत आहे.