प्रवाशांची गैरसोय : खासगी वाहनांचा घ्यावा लागला आधार
प्रतिनिधी /बेळगाव
राज्योत्सव दिन आणि काळय़ा दिनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी शहरासह ग्रामीण भागातील बहुतांशी बस बंद ठेवण्यात आल्या होत्या. गतवषी काही भागात बसवर दगडफेक झाली होती. त्यामुळे यंदा खबरदारी म्हणून परिवहनने काही भागातील बस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी रात्री मराठीबहुल भाग असलेल्या गावांमध्ये वस्तीच्या बस पाठविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. विशेषतः खासगी वाहनांनी प्रवाशांना गाव गाठावे लागले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागील आठ दिवसांपासून विविध मार्गांवर जादा बस सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे परिवहनचा महसूलही वाढताना दिसत आहे. मात्र, मंगळवारी राज्योत्सव दिन आणि काळय़ा दिनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठ आणि इतर व्यवसाय बंद राहिल्याने बाहेर पडणाऱयांची संख्या कमी झाली होती. शिवाय राज्योत्सव दिनानिमित्त धांगडधिंगाणा घालणाऱया युवकांमुळे मुख्य मार्गावर वाहतूक करणे अडचणीचे बनले होते. त्यामुळे शहरांतर्गत बससेवादेखील कोलमडली होती. त्यामुळे इतर वाहनांनादेखील या मिरवणुकीचा नाहक त्रास सहन करावा लागला. शिवाय बससेवेवरही मोठा परिणाम झाल्याचे दिसून आले.
महसुलापासून परिवहन दूरच
कोरोना काळात बससेवा ठप्प झाल्याने परिवहनला कोटय़वधी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. कोरोनानंतर बससेवा विविध मार्गांवर सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे महसूल वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसरीकडे राज्योत्सव आणि इतर कारणांमुळे बससेवेवर परिणाम होत असल्याने अतिरिक्त महसुलापासून परिवहनला दूर राहावे लागत आहे.
वस्तीच्या बसेस बंद
मंगळवारी राज्योत्सव दिन आणि काळय़ा दिनामुळे बहुतांशी ग्रामीण भागातील मुक्कामाचा बस बंद ठेवण्यात आल्या. त्यामुळे रात्री उशिराने घरी परतणाऱया प्रवाशांची गैरसोय झाली. दिवसभर बससेवा बंदच होती. शिवाय रात्रीदेखील मुक्कामाची बस बंद राहिल्याने प्रवाशांना खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागले.