सावंतवाडी/प्रतिनिधी-
१० मार्च ते २७ मार्च कालावधीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह रत्नागिरी येथे ६० वी महाराष्ट्र राज्य हौशी संगीत नाट्य स्पर्धा संपन्न झाली. या नाट्य स्पर्धेत परस्पर सहाय्यक मंडळ (वाघांबे) मुंबई संस्थेच्या “संगीत सुवर्णतुला” नाटकाला प्रथम, अमृत नाट्य भारती, मुंबईच्या “सं. धाडीला राम तिने का वनी” नाटकाला द्वितीय तर अखिल चित्पावन ब्राह्मण विद्यार्थी सहाय्यक मंडळ, रत्नागिरीच्या “संगीत कट्यार काळजात घुसली” नाटकाला तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे.
रत्नागिरी केंद्रावर एकूण १६ नाट्यप्रयोग सादर करण्यात आले होते. या स्पर्धेकरिता परिक्षक म्हणून मुकुंद मराठे, विजय कुलकर्णी, विलास कुडाळकर, ज्ञानेश पेंढारकर आणि श्रीमती अर्चना साने यांनी काम पाहिले. विजेत्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.