बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात नेतृत्वात कोणताही बदल होणार नाही आणि बी. एस. येडियुरप्पा मुख्यमंत्री म्हणून कायम राहतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अश्वथनारायण यांनी दिली.
अलीकडेच केंद्रीय खते व रसायने मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांनी अश्वनाथनारायण मुख्यमंत्री होण्याविषयी बोलले होते, त्यावर अश्वनाथनारायण म्हणाले की केंद्रीय मंत्री यांच्या या विधानाचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. सदानंद गौडा यांनी माझ्याबद्दलच्या त्यांच्या सदभावनामुळे असे म्हटले असेल, परंतु या कारणास्तव नेतृत्व बदलांचा अंदाज बांधणे योग्य नाही.