ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर आठवडाभर रखडलेल्या खातेवाटपाची यादी आज जाहीर झाली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिफारस केलेल्या मंत्रिमंडळाच्या खातेवाटपास राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज सकाळी मान्यता दिली.
काल सायंकाळी 7 वाजता राज्यपालांकडे खातेवाटपाची यादी पाठवण्यात आली. त्यावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज सकाळी या यादीला मंजुरी दिली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. त्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ व नियोजन, अनिल देशमुख यांच्याकडे गृह, एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास, बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल, अशोक चव्हाण यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यावरण आणि पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे.
तर नितीन काशिनाथ राऊत यांच्याकडे उर्जा, वर्षा एकनाथ गायकवाड – शालेय शिक्षण, जितेंद्र सतिश आव्हाड-गृहनिर्माण, सुनिल छत्रपाल केदार-पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रीडा व युवक कल्याण, विजय वडेट्टीवार- इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्मया जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसन
अमित विलासराव देशमुख- वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्य, उदय रविंद्र सामंत -उच्च व तंत्र शिक्षण, दादाजी दगडू भुसे- कृषि, माजी सैनिक कल्याण, संजय दुलिचंद राठोड- वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, गुलाबराव रघुनाथ पाटील-पाणी पुरवठा व स्वच्छता, के.सी. पाडवी-आदिवासी विकास, संदिपानराव आसाराम भुमरे- रोजगार हमी, फलोत्पादन, बाळासाहेब उर्फ श्यामराव पांडुरंग पाटील-सहकार, पणन, अनिल दत्तात्रय परब-परिवहन, संसदीय कार्य
अस्लम रमजान अली शेख-वस्त्राद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास, यशोमती ठाकूर (सोनवने)-महिला व बालविकास, शंकराराव यशवंतराव गडाख-मृद व जलसंधारण, तर धनंजय पंडितराव मुंडे यांच्याकडे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य खाते सोपविण्यात आले आहे.