मुख्यमंत्री येडियुराप्पा यांचे संकेत
प्रतिनिधी/ बेंगळूर
ग्रामपंचायत निवडणूक आणि मंत्रिमंडळ विस्तार यांच्यात कोणताही संबंधी नाही. मंत्रिमंडळ विस्तारासाठी ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता अडथळा ठरणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी दिले आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वीच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होईल, असे संकेत मिळाले आहेत.
मंत्रिमंडळ विस्ताराला विलंब होत असून भाजपमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अशात ग्रा. पं. निवडणुका जाहीर झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार निवडणुकीपूर्वी होईल का?, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी निवडणूक आचारसंहिता जारी असल्याने विकासकामे, नव्या योजनांची घोषणा करता येणार नाही. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराला कोणताही अडसर ठरणार नाही, असे स्पष्टीकरण दिले आहे.