बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी शनिवारी असा दावा केला की मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा प्रशासन कोविड प्रकरणे राज्यात कमी होत असल्याबद्दल खोटे बोलत आहेत. तसेच त्यांनी सरकारने राज्यातील कोरोना चाचण्यांची संख्या कमी केल्याचेही अधोरेखित केले. दरम्यान, सरकारने चाचण्या कमी करण्याचा घेतलेला निर्णय मूर्खपणाचा असल्याचे सिद्धरामय्या म्हणाले.
माजी मुख्यमंत्र्यांनी सिद्धरामय्या यांनी २५ एप्रिल रोजी राष्ट्रीय आरोग्य अभियान (कर्नाटक) च्या संचालक अरुंधती चंद्रशेखर यांनी जारी केलेले परिपत्रक ट्वीट केले असून त्यानुसार पुढील आदेश येईपर्यंत कोरोना चाचणीची संख्या कमी करत असल्याचे म्हंटले आहे. सिद्धरामय्या म्हणाले, “कोविड -१९ प्रकरणाविषयी मुख्यमंत्री खोटी माहिती देत आहेत. मुख्यमंत्री हे कशाचे धोके आहेत हे तुम्हाला माहिती आहे काय?” असा सवाल त्यांनी विचारला आहे.
संक्रमित रुग्णांची ओळख पटविण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या करणे अनिवार्य आहे. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि त्या व्यक्तीच्या घरात राहणारे सर्व सदस्य, गर्भवती महिला आणि संशयित कोविड -१९ मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणि क्वारंटाईन व्यक्तींच्या प्राथमिक संपर्कात आलेल्या सर्वांची कोरोना चाचणी करणे अनिवार्य आहे, असे सिद्धरामय्या म्हणाले.
सिद्धरामय्या यांनी, चाचण्या कमी करण्याचा भाजप सरकारचा निर्णय मूर्खपणाचा आहे. दरम्यान, राज्यात लॉकडाऊन असूनही कोरोना नियंत्रणात येत नाही. अशी शक्यता आहे की संक्रमित व्यक्तीला लक्षणे नसल्यामुळे त्याची चाचणी केली जात नाही. जर चाचण्या केल्या नाहीत, तर बर्याच जणांना कोरोनाची लागण होईल,” असे ते म्हणाले.