बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य सरकार कोरोना साथीच्या दुसर्या लाटेला गांभीर्याने न घेत सर्वसामान्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करीत आहे. पोटनिवडणुकीच्या निकालाबाबत सरकार फक्त चिंतेत आहे. असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या यांनी म्हंटले आहे.
सिद्धरामय्या यांनी ट्विटरवर, राज्य सरकारकडे कोरोना सारख्या समस्येवर सामोरे जाण्यासाठी कोणतीही स्पष्ट कृती योजना नाही. साथीच्या शिखरावर पोहोचल्यानंतर आता या सरकारला विरोधी पक्ष आठवत आहेत. विभागांमध्ये समन्वयाच्या अभावामुळे परिस्थिती गंभीर होत चालली आहे, असे त्यांनी म्हंटले आहे.
राज्यात जलद चाचण्या केल्या जात नाहीत. तपास अहवाल वेळेवर उपलब्ध होत नाही. कोरोना बाधित व्यक्तीला वैद्यकीय उपचारासाठी रुग्णालयात जावे लागते. कोणत्याही रुग्णालयात ४-५ तासांपर्यंत बेड न मिळाल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे. मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी कुटुंबातून पॅकेज म्हणून ४० हजार रुपये गोळा केले जात आहेत.
प्रशासनावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही. परिस्थिती टोकाला पोहोचली असूनही राज्य सरकार केवळ खासगी क्षेत्रातील रुग्णालयांना धोका दर्शविण्यात व्यस्त आहे. सरकारी रूग्णालयात वैद्यकीय उपचार होत नाहीत. खासगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार मिळणे ही सामान्य माणसाची गोष्ट नाही.