रत्नागिरी प्रतिनिधी
नवीन मासेमारीतील जाचक अटींमुळे पर्ससीन मासेमारी धोक्यात आली आहे. राज्य सरकारने या अटी रद्द कराव्यात आणि पर्ससीन मासेमारीला लक्ष्य करून कारवाई करू नये. पर्ससीन मासेमारी व्यतिरिक्त इतर मासेमारी पद्धतींचाही अभ्यास करावा, या मागणीसाठी गुरुवारी मच्छीमार व महिलांनी मिरकरवाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून आपल्या मागण्यांचे निवेदन डॉ. बी. एन. पाटील यांना दिले. या मोर्चात ४-५ हजार मच्छीमार बांधव सहभागी होते. हा मोर्चा लोकशाही कार्यान्वित करण्यासाठी हजारो मच्छीमारांनी घोषित केलेल्या घोषणांनी दणाणून सोडले.