रत्नागिरी/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा कोकणात आहे. दरम्यान महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिक येथे दाखल झालेल्या तक्रारीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. यांनतर त्यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मंजूर करण्यात आला. ता राणे यांची जन आशीर्वाद यात्रा पुन्हा सुरु होणार आहे. नारायण राणेंच्या कोकणातल्या जन आशीर्वाद यात्रेला ब्रेक लावण्यासाठी जमावबंदी लागू केल्याचा आरोप भाजपने केलाय. मात्र जन आशीर्वाद यात्रेसाठी जमावबंदी लागू करण्यात आलेली नाही, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले आहे. आज रत्नागिरी जिल्ह्याला दौऱ्यावर आहेत. यावेळी सामंत यांनी माध्यमांशी बोलताना त्यांनी राणे यांच्या अटकेसाठी मी दबाव टाकला नाही, दबाव टाकला असल्याचं सिद्ध झालं तर राजकारणातून संन्यास घेईन असही त्यांनी म्हटंलं आहे.
आम्हाला उद्धव ठाकरे यांच्याबाबत अभिमान
यावेळी ते म्हणाले, कुणी येणार आहे म्हणून मी आज जिल्हा दौऱ्यावर आलो नाही. उद्या मी सिंधुर्दुगच्या दौऱ्यावर असणार आहे. हा निव्वळ योगायोग आहे. जी कारवाई झाली ती कायदेशीर होती. प्रत्येक नेत्याला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला आपल्या नेत्याबद्दल अभिमान असतो. आम्हाला मुख्यमंत्र्यांबद्दल अभिमान आहे. ते गेली दोन वर्षे झाली अतिशय चांगले काम करत आहेत. कदाचित देश पातळीवर पहिल्या पाच क्रमांकात उद्धव ठाकरे यांचे नाव आल्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठला असण्याची शक्यता आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला