दालनातील काढलेल्या फोटोवरून पं. स. सभापतींना घरचा आहेर
वार्ताहर / कणकवली:
सभापती दालनात लावण्यात आलेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे व आमदार नीतेश राणे यांचे काढून ठेवण्यात आलेले फोटो अद्याप का लावण्यात आले नाहीत? सहा महिन्यांत बाकीचे फोटो होते, त्या जागेवर लागले. मग केवळ राणेंच्या फोटोंनाच उशीर का? राणेंची कुणाला ऍलर्जी आहे का? असा सवाल उपस्थित करत पं. स. सदस्या भाग्यलक्ष्मी साटम यांनी सत्ताधाऱयांना घरचा आहेर दिला. मात्र हे काढलेले फोटो लावण्याबाबत सूचना देण्यात आल्याचे सभापती दिलीप तळेकर यांनी सांगितले. सभापती झाल्यानंतरच्या पहिल्याच बैठकीत सत्ताधारी सदस्यांनी तळेकर यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र या विषयावर बैठकीतच पडदा टाकण्यात आला.
कणकवली पं. स. ची मासिक बैठक पं. स. च्या सभागृहात सभापती तळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपसभापती दिव्या पेडणेकर, गटविकास अधिकारी मनोज भोसले उपस्थित होते. सभापतींच्या दालनात नारायण राणे व नीतेश राणे यांचे गावठी आठवडा बाजाराच्या पाहणीचे फोटो हे आचारसंहिता कालावधीत काढून ठेवण्यात आल्यावरून सौ. साटम यांनी बैठकीत मुद्दा उपस्थित करीत सत्ताधाऱयांना घरचा आहेर दिला.
घरकुल योजनेचे लाभार्थी अडचणीत
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दोन गुंठे बक्षीसपत्राने जागा द्यावी लागते. मात्र दुय्यम निबंधक यांच्याकडून घरकुल योजनेसाठीच्या दोन गुंठे बक्षीसपत्र करून देण्यास नकार देण्यात येत आहे. यामुळे लाभार्थ्यांना घरे मिळणार कशी? असा सवाल मिलींद मेस्त्राr यांनी केला. याबाबत तहसीलदारांशी चर्चा करण्यात आली. त्यांनी हा विषय प्रांताधिकाऱयांकडे येत असल्याचे सांगितले. त्यामुळे शासकीय योजनेतून घरकुले मिळणे तालुक्यातील लाभार्थ्यांना अडचणीचे झाल्याचे मेस्त्राr यांनी सांगितले. त्यावर याबाबत प्रांताधिकाऱयांशी चर्चा करण्यात येईल, असे गटविकास अधिकारी मनोज भोसले यांनी सांगितले.
ओसरगाव येथील वीज वाहिनीचे काम मनमानीपणे
तालुक्यातील बांधकाम उपविभागाच्या ताब्यातील 188 पैकी पाच रस्ते खराब असल्याची माहिती बांधकाम विभागाकडून देण्यात आली. मात्र केवळ पाचच रस्ते खराब आहेत, हे उत्तर योग्य आहे का? व असेल तर त्या पाच रस्त्यांची दुरुस्ती केव्हा करणार, असा सवाल मंगेश सावंत यांनी केला. ही कामे तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे शाखा अभियंता कडुलकर यांनी सांगितले. ओसरगाव येथे 132 केव्हीच्या विद्युत वाहिनीचे काम कोल्हापूर येथील कंपनीमार्फत सुरू करण्यात आले आहे. मात्र तेथील ग्रामस्थांना विश्वासात न घेता हे काम करण्यात येत असून ग्रामस्थांचे होणारे नुकसान कोण देणार? कंपनीकडून पोलीस बंदोबस्त मागवून काम करण्यात येत आहे. या विद्युत वाहिनीमुळे ग्रामस्थांचे नुकसान होत आहे. त्याची भरपाई देण्यात यावी व ग्रामस्थांना विश्वासात घेत काम करण्यात यावे, अशी मागणी मेस्त्राr यांनी केली.
टोलवाटोलवी ऐकून घेणार नाही
तालुक्यातील नदी, ओढय़ांवरील बंधाऱयांना टाकण्यात येत असलेल्या प्लेट पोकळ राहत असल्याने बंधाऱयातील पाणी लिकेज होते, असा मुद्दा मनोज रावराणे, प्रकाश पारकर यांनी मांडला. जिल्हा नियोजन समितीच्या पदसिद्ध सदस्यपदी सभापतींना घेण्यात यावे, असा ठराव बैठकीत घेण्यात आला. तालुक्यातील अनेक ग्राहकांची वीज कनेक्शन प्रलंबित असून, ही कनेक्शन केव्हा देण्यात येणार, असा सवाल गणेश तांबे यांनी केला. अर्ज आल्यापासून सहा दिवसात कनेक्शन देण्यात येत असल्याचे वीज वितरणच्या अधिकाऱयांकडून सांगण्यात आले. मात्र या उत्तराने समाधान न झाल्याने सदस्य व सभापतींनी आक्रमक भूमिका घेत यापुढे तुमची टोलवाटोलवी ऐकून घेणार नाही, असे अधिकाऱयांना सुनावले.
वायरमनकडे अपडेट यादी द्या
तालुक्यातील वीजबिल थकबाकी वसूल करण्यासाठी वायरमन जातात, त्यांच्याकडे अपडेट यादी नसल्याने वीज ग्राहक व वायरमनमध्ये वादाचे प्रसंग घडतात. त्यामुळे वसुलीसाठी जाणाऱया वायरमनकडे बिल भरणा केलेली अपडेट यादी द्या, अशी मागणी सुजाता हळदिवे यांनी केली. तालुक्यातील जीर्ण झालेले विद्युत पोल बदलण्याची मागणी सदस्यांनी केली. कासार्डे – देऊळकरवाडी येथील पोलबाबत दीड वर्षापासून मागणी करूनही कार्यवाही होत नाही. आता यापुढे तुमची कारणे ऐकणार नाही. पुढच्या बैठकीच्या आत हा प्रश्न निकाली निघाला पाहिजे, असे प्रकाश पारकर यांनी सांगितले. यावेळी वीज अधिकाऱयांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने सदस्यांनी संतप्त भूमिका घेतली. अनुसुचित जाती, भटक्या जमाती या मागासप्रवर्गातील मुलींना उपस्थिती भत्ता देण्यात येतो. मात्र गेल्या 28 वर्षांत हा भत्ता वाढविण्यात आला नाही. त्यामुळे हा भत्ता वाढविण्याबाबत मागणी करण्याचा ठराव गणेश तांबे यांनी मांडला.