मुंबई/प्रतिनिधी
महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिक येथे दाखल झालेल्या तक्रारीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. यांनतर त्यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मंजूर करण्यात आला. परंतु नारायण राणे यांना अटक केल्यानंतर भाजपाच्या प्रमुख नेत्यांकडून याबाबत प्रतिक्रिया येत आहेत. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील याप्रकरणी भाष्य केलं आहे. महाराष्ट्र सरकारने जन आशीर्वाद यात्रेला जनतेचा पाठिंबा पाहून हताश होऊन ही पावले उचलली आहेत असे स्मृती इराणी म्हणाल्या.
नारायणर राणेंच्या अटकेवर केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. त्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याच्या अटकेनंतर अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलणाऱ्या लोकांनी मौन बाळगल्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “ही दुखःद गोष्ट आहे की संविधान आणि कायद्याचे उल्लंघन केले आहे. महाराष्ट्र सरकारने जन आशीर्वाद यात्रेला जनतेचा पाठिंबा पाहून हताश होऊन ही पावले उचलली आहेत. आमच्या पक्षाच्या प्रमुखांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे,” असे स्मृती इराणी म्हणाल्या.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार “ज्यांना अटकेसंदर्भात आदेश देण्याचा कायदेशीर हक्क नाही अशा मंत्र्याने राणेंना अटक करण्याचे आदेश दिले. राणेंना अटक करण्याचे महाराष्ट्र सरकारचे राजकीय षडयंत्र आहे, असे स्मृती इराणींनी म्हटले आहे.