प्रतिनिधी / रत्नागिरी
रात्री उशिरा आलेल्या अहवालानुसार जिल्ह्यातील 8 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर कोरोनामुळे पाचवा बळी गेला. यामध्ये रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर तालुक्यातील समावेश आहे. यामध्ये रत्नागिरीतील तीन, संगमेश्वरतील तीन आणि राजापूर व लांजा प्रत्येकी एक असे रुग्ण आहेत. यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 183 इतकी झाली आहे.