प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हयातील राधानगरी अभयारण्य पर्यटन विकासाचे प्रतीक म्हणून लोगोचे अनन्यसाधारण महत्व आहे, असे प्रतिपादन आमदार प्रकाश अबिटकर यांनी केले.
राधानगरी येथे राधानगरी अभयारण्य लोगो स्पर्धचे नुकतेच बक्षीस वितरण झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी कोल्हापूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक क्लेमेन्ट बेन, कोल्हापूर वन्यजीवचे मुख्य वनसंरक्षक समाधान चव्हाण, विभागीय वनाधिकारी विशाल माळी, सुहास वायनगंकार, जय सामंत, सुनील करकरे, यादव तरटे पाटील, कल्याण निकम, संदीप पाटील उपस्थित होते. सम्राट केरकर यांनी प्रास्ताविक केले. वनक्षेत्रपाल नवनाथ कांबळे यांनी आभार मानले. स्पर्धेत मुंबई येथील संजयकुमार दरमावर यांच्या लोगोलो प्रथम तर प्रसन्न जगताप व निर्मिती ग्राफिक्स कोल्हापूर यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. स्पर्धेत 108 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.