राधानगरी / प्रतिनिधी
म्हासुर्ली पैकी जोगमवाडी येथील घटना ताजी असतानाच राधानगरी तालुक्यातील धामोड इथेही लग्न लावून आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा उघड झाला आहे. धामोड इथले प्रवीण राजाराम बोरनाक या बत्तीस वर्षाच्या तरुणाच्या सुमारे तीन लाख 90 हजार रुपये आर्थिक फसवणूक झाल्याच्या फिर्यादीनुसार राधानगरी पोलिसांनी नऊ जणांवर गुन्हा नोंद केला आहे. रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे.
धामोड येथे फिर्यादी प्रवीण बोरनाक यांची दोन लाख दहा हजार आणि श्रीकांत ज्ञानदेव जाधव यांची एक लाख ऐंशी हजार दोघांची लग्न जुळवण्यासाठी मध्यस्थांनी लग्न जुळवण्यासाठी आर्थिक रक्कम घेऊन मुलगीच्या अगोदरच्या लग्नाची माहिती लपवून विवाह लावून दिला. आणि रोख रक्कम आणि सोन्याचांदीच्या दागिने सह सुमारे तीन लाख नव्वद हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा उघड झाला आहे.
यात छाया प्रकाश दामुगडे, घानवडे तालुका करवीर, संध्या विजय स्वप्रेकर सांगली, वैभव पांडुरंग कदम चिकोडी बेळगाव, प्रियंका राजू जाधव मुंबई, पुनम कुमार जीवने चिकोडी बेळगाव, चेतन प्रल्हाद गायकवाड सोलापूर, पंकज श्रावण भालेराव सोलापूर, मेघा राजाराम मुळेद सांगली, अश्विनी श्रावण भालेराव सोलापूर, या नऊ जणांवर राधानगरी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही एन घाडगे, पोलिस कॉन्स्टेबल बजरंग पाटील यांच्यासह राधानगरी पोलीस करत आहेत.