प्रतिनिधी / सरवडे
राधानगरी तालुक्यातील सर्वच गावे कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी सज्ज झाली आहेत. अनेक गावांनी संचारबंदी केली असून कोरोनाचा संसर्ग पसरू नये याची खबरदारी घेतली जात आहे. तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या विविध गावातील ६३२२ जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ११९९ लोकांचा कालावधी संपला असून अजूनही ५१२३ होमक्वारंटाईन आहेत. आरोग्य विभाग व प्रशासन त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.
तालुक्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. ग्रामपंचायती, नियंत्रण समिती व स्थानिक ग्रामस्थ एकजुटीने काम करीत असून,कोरोनाचा प्रसार होवू नये यासाठी काळजी घेत आहेत. गावात बाहेरून आलेल्या लोकांची माहिती घेऊन ६३२२ लोकांना होम क्वारंटाईन केले होते. त्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत सरवडे १४२१,कसबा वाळवे ११६७, ठिकपुर्ली ४९७, कसबा तारळे ९४७, राशिवडे ५९२, धामोड ४९९ असे ६३२२ होमक्वारंटाईन करण्यात आले होते. त्यापैकी ११९९ लोकांचा क्वारंटाईन कालावधी संपला असून त्यामध्ये केंद्र निहाय्य सरवडे १८०,कसबा वाळवे १७३, ठिकपुर्ली ३६७, कसबा तारळे १६२, राशिवडे ११२, धामोड २०५असा समावेश आहे.
तालुक्यात परदेशातून १६ लोक आले असून त्यांच्यावर तहसील कार्यालय व आरोग्य विभाग विशेष ठेवून आहे. तालुक्यात कोणीही संशयित दिसून आला तर तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा.असे आवाहन तहसिलदार मीना निंबाळकर यांनी केले आहे.