राधानगरी/प्रतिनिधी
शहरात पावसाने उघडीप घेतली असून धरणक्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत. दरम्यान, धरणाच्या स्वयंचली ३ आणि ६ नंबरच्या दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सध्या दोन्ही गेटमधून सुमारे ४,२५६ क्युसेकने विसर्ग सुरु झाला आहे.
पंचगंगा नदी पाणी पातळी स्थिर असून दिवसभर फक्त एक इंचाने पाणी उतरले असून राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी ३३ फूट पाच इंच इतकी होती. जिल्ह्यातील ४९ बंधारे पाण्याखाली आहेत.