राधानगरी / प्रतिनिधी
गेल्या दोन दिवसापासून राधानगरी तालुक्यात पावसाने दमदार सुरवात केली आहे. राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात तब्बल २२० मिलिमीटर इतका उच्चांकी पाऊस झाला, त्यामुळे तालुक्यातील ओढे नाले, धबधबे ओसंडून वाहू लागलेत, डोंगर दऱ्यांचे मनमोहक दृश्य वर्षा पर्यटकांना खुणावू लागलंय परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना संधी असल्याने पर्यटकांना हा आनंद लुटता येणार नाही.
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात तब्बल २२० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे. जून अखेरपर्यंत २० टक्केच पाणी शिल्लक ठेवण्याचं उद्दिष्ट असलं तरी धरणाचा पाणीसाठा अठ्ठावीस टक्के इतका शिल्लक आहे. धरणातून ८४१ क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. पावसाचा जोर असाच राहील्यास कसबा तारळे इथला जुना बंधारा आणि शिरगाव पूल पाण्याखाली जाण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.