अलका लांबाची आरोप
प्रतिनिधी / पणजी
केंद्रातील मोदी सरकारने राफेल खरेदी प्रकरणात प्रचंड मोठा घाटळा केल्याने देशाला सुमारे 41 हजार 205 कोटी रुपयांच्या नुकसानीला समोरे जावे लागले आहे असे काँग्रेसच्या अलकालांबा यांनी सांगितले. प्रंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः भ्रष्टाचार करीत आहेत आणि काँग्रेसच्या नावाने शंक ठोकीत आहेत. एकूणच चोराच्या उलटय़ा बोंबा असाच हा प्रकार आहे. असेही लांबा म्हणाल्या.
गुरुवारी पणजीत घेतलेल्या पत्रकार परीषदेत त्या बोलत होत्या. त्यांच्या सोबत प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर, उपाध्यक्ष संकल्प आमोणकर उपस्थित होते. मोदी सरकारचा भ्रष्टाचार अमंल बजावणी संचालनालयाने उघड केला असला तरी पुढील तपासकाम ठप्प झाले आहे असेही लांबा म्हणाल्या.
राफेल खरेदी करण्याचा विचार काँग्रेस सरकारचा होता त्यासाठी सर्वा सोपस्करही पूर्ण करून प्रत्येकी 526 कोटी रुपयांना 126 राफेल विमाने घेण्याचे ठरले होते. राफेल खरेदी व्यवहार प्रकरणात मोठा घोटाळा होत असल्याचा त्यावेळी विरोधी बाकावर असलेल्या भाजपने मनमोबन सिंग सरकारवर आरोप केले होते. त्यावेळी काँग्रेस सरकारने राफेल खरेदी व्यवहार रद्द करून चौकशीला समोरे जायची तयारी दाखविली होती. त्यानंतर सत्तेत आलेल्या भाजप सरकारने प्रती विमान 1 हजार 670 रुपयांना केवळ 36 विमानांची खरेदी केली आहे. या व्यवहरात मध्यस्ती करणाऱया व्यक्तीला 60 ते 80 कोटी रुपये कमीशन देण्याचे देण्यात आले होते. असेही लंबा यांनी सांगितले.
भ्रष्टाचाराचा सारा प्रकार अमंल बाजवणी संचालनालयाने तसेच सीबीआयने उघडकीस आणला होता. मात्र तपास काम करणाऱया त्या उधिकांऱयांच्या बदल्या करण्यात आल्या तसेच तबावयंत्राचा वापर करून तपास कामच बंद करण्यात आले. असा आरोपही लांबा यांनी केला आहे.
वाढत्या महागाईने सर्वसामान्य लोकांचे कंबरडे मोडले आहे. कँग्रेस पक्ष महागाई विरोधात देशभरात जनजागृती अभियान सुरु करणार आहे त्याच्याच एक भाग म्हणून गोव्यातही 17 नोव्हेंबर सकाळी 8 वाजल्यापासून राज्यात जनजागृती अभियान सुरु करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले. आठवडाभर हे अभियान सुरु असणार असून गावागावात जाऊन लोकांना भेटणार. उत्तर गोव्यासाठी बाबी बागकर नेतृत्व करणार तर दक्षिण गोव्यात विठोबा देसाई नेतृत्व करतील. असेही चोडणकर यांनी सांगितले.
डॉ. प्रमोद सावंत सरकारला भाजपचेच आमदार कंटळलेले आहे. 6 ते 8 भाजपचे विद्यमान आमदारांना येत्या विधानसभा निवडणूकीत निवडून येणार की नाही त्याचा विश्वास नसल्याचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले. त्यामुळे ते आमदार भाजपतर्फे निवडणूकीला उभे रहावे की नाही याचा विचर करीत असल्याचेही चोडणकर म्हणाले,
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा बरोबर युती करणार काय असे विचारले असता चोडणकर म्हणाले की दोन्ही पक्षांच्या हायकमांडची युतीबाबत बोलणी झाली आहे. आमच्या हायकमांडनी आपल्याला राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्याशी बोलणी करण्यास सांगितल्याने आपणही येथील राष्ट्रवादी नेत्याशी बोलणी केली असल्याचे चोडणकर म्हणाले.