वार्ताहर/ रामदुर्ग
जनतेच्या समस्यांकडे लक्ष देत केंद्र सरकारने सामाजिक भद्रता योजना अंमलात आणली असून या योजनेचा लाभ सर्वांना मिळावा, असे मत आमदार महादेवप्पा यादवाड यांनी व्यक्त केले.
शहरातील आमदारांच्या कार्यालयात कॅनरा बँकेच्या अमुल्या आर्थिक साक्षरता शिबिराच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, लहान व्यापाऱयांना बँकेमार्फत कर्जाची सोय करण्यात येत आहे.
कॅनरा बँकेचे ज्ये÷ प्रबंधक के. पुंडलिक बोलताना म्हणाले, की शासनाच्या योजनेस बँकेद्वारे कर्जाची सोय असून कोणत्याही उद्देशासाठी कर्ज घेण्यात आले आहे, त्याच कामास त्याचा उपयोग केल्यास आपणास उत्तम फायदा मिळेल. त्यामुळे वेळेवर कर्जफेड करण्यात येते. थकबाकीदार झाल्यास कुठल्याच बँकेकडून कर्ज मिळत नसून थकबाकीदारांनी जागृत असावे, असे सांगितले.
अमुल्या आर्थिक साक्षरता केंद्राचे समन्वयक मल्लिकार्जुन रेड्डी गोंदी यांनी सामाजिक भद्रता योजनेच्या विविध योजनांबद्दल माहिती दिली. या शिबिरात ऑटोचालक संघाचे अध्यक्ष मूर्तीजी पेंढारीसह इतर ऑटोचालक उपस्थित होते.