ऑनलाईन टीम / पुणे :
अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी मुहूर्त रामनवमी व अक्षय्यतृतीया या दोन्हीपैकी एक दिवस निवडावा अशी अपेक्षा स्वामी गोविंदगिरी महाराज यांनी व्यक्त केली.
दरम्यान, श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टवर स्वामी गोविंदगिरी महाराज यांची नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.
स्वामी गोविंदगिरी महाराज म्हणाले, आजचा क्षण महत्वाचा आहे. आता भव्य उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज सर्वात आधी मला आठवण होत आहे ती म्हणजे अशोक सिंघल यांची. विश्व हिंदू परिषदेसोबत मी जोडलेलो असल्याने मला मंदिर उभारण्याची आधीपासून माहिती आहे. मंदिर उभारण्यासाठी दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागणार नाही. असंही ते म्हणाले.